Wednesday, June 10, 2026
Homeनागपूरउद्यापासून बारावी बोर्डाची परीक्षा; विभागात ५१४ परीक्षा केंद्रे..

उद्यापासून बारावी बोर्डाची परीक्षा; विभागात ५१४ परीक्षा केंद्रे..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता बारावी बोर्डाची परीक्षा उद्या, मंगळवार १० फेब्रुवारीपासून सुरू होत आहे.यंदा नागपूर विभागात इयत्ता बारावीच्या परीक्षेस एकूण १ लाख ६० हजार २९२ विद्यार्थी बसणार असून विद्यार्थ्यांसाठी ५१४ परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे.यात नागपूर जिल्ह्यात ६५ हजार ४९९ विद्यार्थी,चंद्रपूर जिल्ह्यात २८ हजार ३०५ विद्यार्थी,गोंदिया जिल्ह्यात १९ हजार ८० विद्यार्थी,भंडारा जिल्ह्यात १७ हजार ३९३ विद्यार्थी,वर्धा जिल्ह्यात १६ हजार ६१९ विद्यार्थी तर गडचिरोली जिल्ह्यात १३ हजार ३९६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे,परीक्षा सुरळीत व सुरक्षितपणे पार पडावी यासाठी प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षिततेसाठी ८४ गोपनीय केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे.
इयत्ता बारावीची परीक्षा ही १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ पर्यंत चालणार आहे.कॉपीमुक्त व पारदर्शक परीक्षा होण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक करण्यात आले असून, त्याबाबत केंद्र संचालकांकडून लेखी हमी घेण्यात आली आहे. परीक्षा केंद्रात मोबाइल फोन,कॅलक्युलेटर,डिजिटल घड्याळ,कागदी चिठ्ठया,गाइड,आदी साहित्य नेण्यास सक्त मनाई आहे.सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीद्वारे निगराणी ठेवली जाणार असून,संवेदनशील केंद्रांवर विशेष बैठे पथके तैनात असतील.पोलिस विभागाकडून ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातूनही देखरेख केली जाण्याची शक्यता आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना झटका.. आता नऊ सिलेंडरवर नाही; तर चारच सिलेंडरवर मिळणार अनुदान..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात रविवार ७ जून २०२६ पासून २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.त्यानुसार, बऱ्याचश्या जिल्ह्यांमध्ये गॅस सिलेंडरच्या किंमतींनी...

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी आधार पडताळणी करणे आवश्यक..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक शेतकरी गेल्या काही वर्षापासून नैसर्गिक आपत्ती,अवकाळी पाऊस, उत्पादन खर्चातील वाढ आणि शेतमालाला न मिळणारा योग्य भाव,यामुळे आर्थिक संकटाचा सामना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!