- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता बारावी बोर्डाची परीक्षा उद्या, मंगळवार १० फेब्रुवारीपासून सुरू होत आहे.यंदा नागपूर विभागात इयत्ता बारावीच्या परीक्षेस एकूण १ लाख ६० हजार २९२ विद्यार्थी बसणार असून विद्यार्थ्यांसाठी ५१४ परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे.यात नागपूर जिल्ह्यात ६५ हजार ४९९ विद्यार्थी,चंद्रपूर जिल्ह्यात २८ हजार ३०५ विद्यार्थी,गोंदिया जिल्ह्यात १९ हजार ८० विद्यार्थी,भंडारा जिल्ह्यात १७ हजार ३९३ विद्यार्थी,वर्धा जिल्ह्यात १६ हजार ६१९ विद्यार्थी तर गडचिरोली जिल्ह्यात १३ हजार ३९६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे,परीक्षा सुरळीत व सुरक्षितपणे पार पडावी यासाठी प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षिततेसाठी ८४ गोपनीय केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे.
इयत्ता बारावीची परीक्षा ही १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ पर्यंत चालणार आहे.कॉपीमुक्त व पारदर्शक परीक्षा होण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक करण्यात आले असून, त्याबाबत केंद्र संचालकांकडून लेखी हमी घेण्यात आली आहे. परीक्षा केंद्रात मोबाइल फोन,कॅलक्युलेटर,डिजिटल घड्याळ,कागदी चिठ्ठया,गाइड,आदी साहित्य नेण्यास सक्त मनाई आहे.सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीद्वारे निगराणी ठेवली जाणार असून,संवेदनशील केंद्रांवर विशेष बैठे पथके तैनात असतील.पोलिस विभागाकडून ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातूनही देखरेख केली जाण्याची शक्यता आहे.
- Advertisement -

