Sunday, April 19, 2026
Homeपुणेआता सातबाऱ्यावर नमूद होणार आईचे नाव…

आता सातबाऱ्यावर नमूद होणार आईचे नाव…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

पुणे :-भूमी अभिलेख विभागाने आईचे नाव सातबारावर लावण्याचा निर्णय घेतला असून,ही प्रक्रिया डिसेंबर महिन्यापासून प्रत्यक्षात सुरू करण्यात येणार आहे.यासाठी राज्य शासन ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देणार आहे.अर्थात,आईचे नाव सातबारावर दाखल करण्यापूर्वी संबंधित कुटुंबातील आईचे नाव हेच आहे का,याची खातरजमा करण्यासाठी तलाठी संपूर्ण कुटुंबाला बोलावू शकतो.तसेच आईचे नाव तपासण्यासाठी तलाठ्यांना कसरत करावी लागणार आहे.

राज्य सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाने महिलांच्या नावाचा अर्थात आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला.त्याच अनुषंगाने एक मे २०२४ नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या नावे जमीन, सदनिका खरेदी केल्यास त्याच्या नावासह आईच्या नावाचा उल्लेख करण्यात येणार आहे.त्यासंदर्भात आता संगणक प्रणाली राबविण्याची प्रक्रिया भूमी अभिलेख विभागामार्फत सुरू आहे.१ मे २०२४ नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या जन्म नोंदणीवेळीच त्याच्या आईच्या नावाचा समावेश करण्यात येणार आहे.सध्याच्या व्यक्तींच्या नावासोबत आईच्या नावाचा समावेश करता येईल; परंतु त्यासाठी आईच्या नावाचा नवा रकाना तयार करण्यात येणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची; सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू ठेवण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अश्यातच चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाची...

चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच उडाला भडका; पतीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-स्वयंपाकघरातील गॅस लिकेज असल्याने चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच आगीचा अचानकपणे भडका उडाला आणि काही क्षणातच सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला.दरम्यान,संपूर्ण घरात...

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!