Friday, April 17, 2026
Homeनागपूरआकाश रामटेके मौज-मजा म्हणून करायचा चोऱ्या; शेवटी अडकला जाळ्यात..!

आकाश रामटेके मौज-मजा म्हणून करायचा चोऱ्या; शेवटी अडकला जाळ्यात..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :-विविध चोर चोऱ्या करून ऐशो-आरामाचे  जीवन जगण्याची इच्छा बाळगतात.पण नागपुरात असाही एक चोर पोलिसांच्या हाती लागलाय की,तो मौज-मजा म्हणून नागरिकांच्या घरी तसेच वाहनांची चोरी करायचा.तो इक्यावरच थांबला नाही,तर त्याने आपल्या टोळीत चक्क दोन अल्पवयीन मुलांनाही आमिष दाखवून सामील केले.मात्र,एका चोरीने त्याचा भांडाफोड झाला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला.आकाश नरेंद्र रामटेके वय २३ वर्षे रा. चंद्रमणीनगर,नागपूर असे बहुचर्चित अटकेतील आरोपी चोराचे नाव आहे.पोलिसांनी त्यांच्याकडून कार व दुचाकीसह एकूण सात वाहने जप्त करून अटक केली आहे.

  • असे अडकले जाळ्यात👇
आकाश रामटेके हा नागपुरातील बहुचर्चित चोर आहे.छोट्या चोऱ्या करता-करता मोठ्या चोऱ्या करू लागला.अश्याच प्रकारे त्याने मोठा डल्ला मारला.
नागपुरातील अजनीच्या विश्वकर्मानगरात राहणारे फिर्यादी मोहन वासुदेव अंबुलकर यांची बहीण अरुणा सुरेश आस्करकर वय ६० वर्षे ह्या रामेश्वरी परिसरात वास्तव्यास आहेत.१६ जुलैच्या सायंकाळी अरुणा या घराला कुलूप लावून कुटुंबासह मुंबईला गेल्या होत्या. या दरम्यान चोरांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडले. कपाटातील चांदीचे दागिने आणि अंगणात उभी त्यांची एमएच-३१/ईके-६८१० क्रमांकाची कार चोरी करून पसार झाले.मोहनच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवून खबऱ्यांना कामावर लावले.खबऱ्यांना गुप्त माहितीच्या आधारे चोरीत बहुचर्चित चोर आकाश रामटेके याचा हात असल्याची माहिती मिळाली.त्यानुसार अजनी पोलिसांनी आकाशला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच पोपटासारखा बोलू लागला.त्याने इतरही चोऱ्या केल्याची कबुली दिली.यात दोन अल्पवयीन मुलांचा वापर केला.
त्यानुसार त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विद्यार्थ्यांसह नागरिकांसाठी राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा; प्रथम बक्षीस ३१ हजार रुपये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्य,रोजगार व उद्योजकता,नाविन्यता विभागामार्फत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती प्रीत्यर्थ राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेत राज्यभरातील विद्यार्थी...

कामगारांसाठी दिलासादायक निर्णय; आता गोण्यांचे वजन राहणार ५० किलोपर्यंतच..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-डोक्यावर,पाठीवर ओझे वाहून नेणारे, अंगमेहनतीची कामे करणारे कामगार म्हणजेच माथाडी(हमाल)कामगारांना दररोज जड गोण्या(पोते) उचलण्याचे काम करावे लागते.धान,कांदा,बटाटा आणि इतर शेतमालाच्या व्यवहारात अनेक...

आज प्रोजेक्ट ‘उडान’ अंतर्गत १ हजार २७८ युवकांना रोजगार.. -नक्षलवाद विरोधी अभियानासाठी ३१ चारचाकी वाहनांचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आधुनिक युगाच्या बदलत्या गरजेनुसार युवकांनी शिक्षणासोबत तांत्रिक कौशल्य आत्मसात करून स्वतःमध्ये आवश्यक बदल घडवून आणावेत, असे आवाहन राज्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल...

चार शाळकरी मुलांचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-शाळेची सुट्टी झाल्यानंतर घराकडे परतणाऱ्या चार अल्पवयीन शाळकरी मुलांनी रत्याच्या कडेला असलेल्या मार्गावरील खड्ड्यातील पाण्यात उतरून आंघोळ करत असतांनाच खोल पाण्याचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!