Wednesday, May 27, 2026
Homeभंडाराअवघ्या चार दिवसांवर लग्न अन् तरुणाने आजच संपवली जीवनयात्रा..

अवघ्या चार दिवसांवर लग्न अन् तरुणाने आजच संपवली जीवनयात्रा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात आज, गुरुवार १२ मार्च रोजी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. अवघ्या चार दिवसांवर लग्न असतांनाच एका २६ वर्षीय तरुणाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.राजेश अविनाश भेंडारकर वय २६ वर्षे,रा.परसोडी/पाऊळदौना, ता.लाखांदूर,जि.भंडारा असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो चंद्रपूर जिल्ह्याच्या एका सिमेंट कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता.विशेष म्हणजे,राजेशचा विवाह हा येत्या,सोमवार १६ मार्च रोजी होणार होता.तत्पूर्वीच त्याने टोकाचे पाऊल उचलले.
राजेशने घराशेजारील शेताच्या बांधावर असलेल्या आंब्याच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.आज सकाळच्या सुमारास एका महिलेस राजेश फासावर लटकलेल्या अवस्थेत दिसून आल्याने सदरची घटना सर्वत्र उघडकीस आली.मृतक राजेशने आत्महत्या कां केली?अद्याप गुलदस्त्यात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जंगली डुकराची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा मुख्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर जंगली डुकराची धावत्या दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना...

५० हजार देऊनही २५ हजारासाठी तगादा; मंडळ अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका लाचखोर मंडळ अधिकाऱ्याने  शेतजमीनीचे फेरफार करण्यासाठी तब्बल ७५ हजाराची लाच मागणी करून त्यातील ५० हजार घेऊन फेरफार करून दिले,पण उर्वरित...

अजब-गजब कारनामा..! वसतिगृहात कुलरची मागणी केली म्हणून विद्यार्थिनीला हकालपट्टीची नोटीस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या विदर्भात तीव्र उष्णतेची लाट सुरू आहे. यामुळे जीवाची लाही-लाही होत आहे.प्रचंड उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.त्यातच,पंखे व इतर हवेच्या साधनांनी...

‘आंबा महोत्सव-२०२६’; गडचिरोलीसह भंडारा, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यातील २१७ गावांमधून संकलित केलेल्या आंबा वाणांचे प्रदर्शन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक धान पिकासोबतच अधिक उत्पन्न देणाऱ्या फळपिकांकडे वळावे.आंबा हे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पीक असून, शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंब्याची लागवड करणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!