- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात आज, गुरुवार १२ मार्च रोजी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. अवघ्या चार दिवसांवर लग्न असतांनाच एका २६ वर्षीय तरुणाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.राजेश अविनाश भेंडारकर वय २६ वर्षे,रा.परसोडी/पाऊळदौना, ता.लाखांदूर,जि.भंडारा असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो चंद्रपूर जिल्ह्याच्या एका सिमेंट कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता.विशेष म्हणजे,राजेशचा विवाह हा येत्या,सोमवार १६ मार्च रोजी होणार होता.तत्पूर्वीच त्याने टोकाचे पाऊल उचलले.
राजेशने घराशेजारील शेताच्या बांधावर असलेल्या आंब्याच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.आज सकाळच्या सुमारास एका महिलेस राजेश फासावर लटकलेल्या अवस्थेत दिसून आल्याने सदरची घटना सर्वत्र उघडकीस आली.मृतक राजेशने आत्महत्या कां केली?अद्याप गुलदस्त्यात आहे.
- Advertisement -

