- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-जिल्ह्याच्या पारशिवनी तालुक्यातील नेउरवाडा येथील एका ३८ वर्षीय शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना काल शनिवारी खैरी शिवारातील शेतात घडली.शेतकरी व त्याची पत्नी दोघेही शेतातील धुऱ्यावरील काट्या तोडत होते.पत्नी काही अंतरावर जाताच अचानकपणे आलेल्या वाघाने मागून हल्ला चढविल्याने शेतकरी रवींद्र कवडू काळसरपे यांचा घटनास्थळी मृत्यू झाला.
रवींद्र हे पत्नी संगीतासह सकाळी शेतात गेले होते. त्यांनी शेतातील धुऱ्यावरील काट्या तोडणे सुरू केले.काही वेळानंतर पत्नी लगतच्या शेतात ट्रॅक्टर चालकास ट्रॅक्टरबाबत विचारणा करण्यास गेली. अशातच वाघाने रवींद्रवर मागून हल्ला केला.त्यानंतर वाघाने रवींद्रला ओढत शेताशेजारील नाला ओलांडून नाल्याच्या दुसऱ्या काठावर नेले.रवींद्रच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.नाल्याच्या काठावरील दुसऱ्या किनाऱ्यावर एक शेतकरी जात असतांना त्याला वाघ चक्क रवींद्रच्या पाठीवर बसलेला आढळला.तो जोरात ओरडताच वाघ पळून गेला.यानंतर घटनास्थळी मृत रवींद्रची पत्नी व गावातील काही शेतकरी गेले.याबाबत माहिती मिळताच पारशिवणी पोलिस घटनास्थळी पोहचले.त्यांनी आम्ही मृतदेह शेतासमोरील झाडाखाली ठेवतो असे लोकांना सांगितले.पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करीत रवींद्र यांचा मृतदेह पारशिवनी येथील ग्रामीण रुग्णालयात नेला.घटनास्थळी टप्प्याटप्प्याने ३०० लोक एकत्र आले व काहीकाळ तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती.ग्रामस्थांनी मृतदेह परत घटनास्थळी आणण्याची मागणी पोलिस व वनविभागाच्या अधिकाऱ्यांना केल्यानंतर शेवटी दुपारी ३ वाजता मृतदेह पुन्हा नाल्याच्या काठावर नेण्यात आला.प्रसंगी दिशाभूल करून मृतदेह नेल्याचा आरोप नागरिकांनी अधिकाऱ्यांवर केला.यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते,पोलिस निरीक्षक राजेशकुमार थोरात,वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण लेले यासह कर्मचारी उपस्थित होते.
- Advertisement -

