Thursday, April 16, 2026
Homeमुंबईअजित पवारांच्या अपघाती निधनाबाबत तर्कवितर्क न लावता,सखोल चौकशी होऊ द्यावी- मुख्यमंत्री फडणवीस

अजित पवारांच्या अपघाती निधनाबाबत तर्कवितर्क न लावता,सखोल चौकशी होऊ द्यावी- मुख्यमंत्री फडणवीस

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-नुकतेच अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलेल्या संशयावर मुख्यमंत्र्यांनी भाष्य करत म्हणाले की,रोहित पवार यांनी काय वक्तव्य केले,हे मी थेट ऐकले नसले तरी त्यांनी काही प्रेझेंटेशन केले असल्याची माहिती आहे.विविध माध्यमे व नागरिकांनी उपस्थित केलेल्या शंकाच त्यांनी मांडल्या असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.अजित पवार हे महाराष्ट्राचे लाडके व वरिष्ठ नेतृत्व होते.त्यामुळे त्यांच्या अपघाताची पूर्ण,सखोल व निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे,ही मागणी रास्त असून अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत तर्कवितर्क न लढवता,सखोल चौकशी पूर्ण होऊ द्यावी.कोणीही या दुर्दैवी घटनेचे राजकारण करू नये,या अपघाताबाबत कोणाकडे काही पुरावे किंवा मुद्दे असतील,तर त्यांनी ते संबंधित तपास यंत्रणांकडे सादर करावेत,असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज,बुधवार ११ जानेवारी रोजी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाबाहेर माध्यमांशी संवाद साधतांना व्यक्त केले.चौकशी पूर्ण होण्यापूर्वी तर्कवितर्क मांडल्यास लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो,असे सांगत त्यांनी भारतीय तपास यंत्रणांवर अविश्वास दाखवू नये,असे आवाहन केले.मीच सर्वप्रथम केंद्र सरकारला पत्र लिहून योग्य चौकशीची मागणी केली होती.केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांनी विशेष चौकशी समिती स्थापन केल्याचे पत्रही पाठवले असून सध्या तपास सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली.देशातील डीजी एव्हिएशन सेफ्टी हे सर्वोच्च कार्यालय असून आतापर्यंतच्या सर्व विमान अपघातांची चौकशी त्यांनीच केली आहे. याशिवाय,सीआयडीचा समांतर तपास सुरू असून डीजीसीएचीही चौकशी सुरू आहे.अपघातग्रस्त विमानातील ब्लॅकबॉक्स सापडला आहे.शिवाय विमानाचे आवश्यक भाग जप्त करण्यात आले असून पायलट व एटीसीमधील संवाद डिजिटाईज स्वरूपात उपलब्ध आहे. अपघातस्थळावरील नमुने न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत,अशीही माहिती मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!