Sunday, May 31, 2026
Homeगडचिरोलीविद्यार्थ्यांच्या परीक्षाकाळात वीजपुरवठा खंडित करू नये- आमदार मसराम यांच्या अधिकाऱ्यांना सूचना..

विद्यार्थ्यांच्या परीक्षाकाळात वीजपुरवठा खंडित करू नये- आमदार मसराम यांच्या अधिकाऱ्यांना सूचना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-सध्या बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू असून काही दिवसांत दहावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. अश्यातच गडचिरोली जिल्ह्याच्या कोरची तालुक्यात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व त्यांना अभ्यासात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये,यासाठी विशेषतः रात्रीच्या वेळेत वीजपुरवठा खंडित करू नये,अशी सूचना आमदार रामदास मसराम यांनी वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना केली.आज,बुधवार ११ फेब्रुवारी रोजी आमदार मसराम हे कोरची तालुक्याच्या दौऱ्यावर होते. प्रसंगी त्यांनी बैठकीच्या माध्यमातून निर्देश दिलेत. परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना अखंडित व सुरळीत वीजपुरवठा मिळावा,यासाठी विभागाने योग्य नियोजन करावे,असेही त्यांनी स्पष्ट केले.तसेच पशुवैद्यकीय रुग्णालयात आवश्यक उपकरणे व विविध यंत्रणांची कमतरता असल्याची बाब समोर आल्याने पशुपालकांना उपचारासाठी अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निदर्शनास येताच आमदार रामदास मसराम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने जिल्हा स्तरावर मागणी प्रस्ताव पाठवून आवश्यक उपकरणे व सुविधा उपलब्ध करून घ्याव्यात,असे निर्देश दिलेत. पशुपालकांची गैरसोय टाळण्यासाठी त्वरित कार्यवाही करावी,असेही त्यांनी स्पष्ट केले.या प्रसंगी कोरची
काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष मनोज अग्रवाल,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जीवन पाटील नाट,धनपाल मिसार,काँग्रेस कमिटी जिल्हा उपाध्यक्ष सदरूभाई भामानी उपस्थित होते..
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विवाहित महिलेचा गळा चिरून हत्या करणारा आरोपी अटकेत.. – क्षुल्लकशा कारणावरून हत्या; बालपणापासून होते प्रेमप्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या धोपटाळा कामगार वसाहतीत एका विवाहित महिलेची धारदार शस्त्राने गळा चिरून निघृण हत्या करण्यात आल्याची थरारक घटना शुक्रवार...

धानोरा व एटापल्ली तालुक्यात २० हजार धुररहित चुलींचे वितरण.. -दरवर्षी ४१ हजार टनांहून अधिक जळाऊ लाकडाची होणार बचत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शन व पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा व एटापल्ली या दुर्गम,आदिवासी तालुक्यांमध्ये राबविण्यात आलेल्या धुररहित चुल उपक्रमाला उल्लेखनीय...

चार दिवसांत उष्माघाताचे तब्बल १८ जण बळी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या नवतपाचे दिवस सुरू आहेत.२५ मे २०२६ पासून सुरू झालेली सूर्याची दाहकता २ जून २०२६ पर्यंत राहणार आहे.अश्यातच भयंकर तापणाऱ्या नवतप्याने...

हाताची दोन बोटे दाखवून सेल्फी काढत असाल तर सावधान..!

उद्रेक न्युज वृत्त :-डिजिटल युगात सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होतांना दिसून येत आहे.काही कालावधीपासून डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून नागरिकांची लाखो रुपयांपासून ते कोट्यवधी रुपयांची फसवणूक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!