Sunday, May 31, 2026
Homeमुंबईअजित पवारांच्या अपघाती निधनाबाबत तर्कवितर्क न लावता,सखोल चौकशी होऊ द्यावी- मुख्यमंत्री फडणवीस

अजित पवारांच्या अपघाती निधनाबाबत तर्कवितर्क न लावता,सखोल चौकशी होऊ द्यावी- मुख्यमंत्री फडणवीस

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-नुकतेच अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलेल्या संशयावर मुख्यमंत्र्यांनी भाष्य करत म्हणाले की,रोहित पवार यांनी काय वक्तव्य केले,हे मी थेट ऐकले नसले तरी त्यांनी काही प्रेझेंटेशन केले असल्याची माहिती आहे.विविध माध्यमे व नागरिकांनी उपस्थित केलेल्या शंकाच त्यांनी मांडल्या असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.अजित पवार हे महाराष्ट्राचे लाडके व वरिष्ठ नेतृत्व होते.त्यामुळे त्यांच्या अपघाताची पूर्ण,सखोल व निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे,ही मागणी रास्त असून अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत तर्कवितर्क न लढवता,सखोल चौकशी पूर्ण होऊ द्यावी.कोणीही या दुर्दैवी घटनेचे राजकारण करू नये,या अपघाताबाबत कोणाकडे काही पुरावे किंवा मुद्दे असतील,तर त्यांनी ते संबंधित तपास यंत्रणांकडे सादर करावेत,असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज,बुधवार ११ जानेवारी रोजी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाबाहेर माध्यमांशी संवाद साधतांना व्यक्त केले.चौकशी पूर्ण होण्यापूर्वी तर्कवितर्क मांडल्यास लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो,असे सांगत त्यांनी भारतीय तपास यंत्रणांवर अविश्वास दाखवू नये,असे आवाहन केले.मीच सर्वप्रथम केंद्र सरकारला पत्र लिहून योग्य चौकशीची मागणी केली होती.केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांनी विशेष चौकशी समिती स्थापन केल्याचे पत्रही पाठवले असून सध्या तपास सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली.देशातील डीजी एव्हिएशन सेफ्टी हे सर्वोच्च कार्यालय असून आतापर्यंतच्या सर्व विमान अपघातांची चौकशी त्यांनीच केली आहे. याशिवाय,सीआयडीचा समांतर तपास सुरू असून डीजीसीएचीही चौकशी सुरू आहे.अपघातग्रस्त विमानातील ब्लॅकबॉक्स सापडला आहे.शिवाय विमानाचे आवश्यक भाग जप्त करण्यात आले असून पायलट व एटीसीमधील संवाद डिजिटाईज स्वरूपात उपलब्ध आहे. अपघातस्थळावरील नमुने न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत,अशीही माहिती मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विवाहित महिलेचा गळा चिरून हत्या करणारा आरोपी अटकेत.. – क्षुल्लकशा कारणावरून हत्या; बालपणापासून होते प्रेमप्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या धोपटाळा कामगार वसाहतीत एका विवाहित महिलेची धारदार शस्त्राने गळा चिरून निघृण हत्या करण्यात आल्याची थरारक घटना शुक्रवार...

धानोरा व एटापल्ली तालुक्यात २० हजार धुररहित चुलींचे वितरण.. -दरवर्षी ४१ हजार टनांहून अधिक जळाऊ लाकडाची होणार बचत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शन व पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा व एटापल्ली या दुर्गम,आदिवासी तालुक्यांमध्ये राबविण्यात आलेल्या धुररहित चुल उपक्रमाला उल्लेखनीय...

चार दिवसांत उष्माघाताचे तब्बल १८ जण बळी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या नवतपाचे दिवस सुरू आहेत.२५ मे २०२६ पासून सुरू झालेली सूर्याची दाहकता २ जून २०२६ पर्यंत राहणार आहे.अश्यातच भयंकर तापणाऱ्या नवतप्याने...

हाताची दोन बोटे दाखवून सेल्फी काढत असाल तर सावधान..!

उद्रेक न्युज वृत्त :-डिजिटल युगात सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होतांना दिसून येत आहे.काही कालावधीपासून डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून नागरिकांची लाखो रुपयांपासून ते कोट्यवधी रुपयांची फसवणूक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!