- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-ऐन साक्षगंधाचा कार्यक्रम होणार,त्याच दिवशी होणारा नवरदेव पहाटेच्या सुमारास गायब झाल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली होती.बुधवारी ३० एप्रिलला सायंकाळच्या सुमारास त्याचे लग्न होते. अशातच होणारा नवरदेव गायब कां झाला? अश्या पेचप्रसंगात सर्वजण पडले होते.सदरची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील आलेसुर येथे नुकतीच उघडकीस आली होती.
माहितीनुसार,राहुल काशीराम राऊत वय २६ वर्षे
याचे बुधवारी ३० एप्रिलला सायंकाळच्या सुमारास विवाह सोहळा पार पडणार होता.तत्पूर्वी सोमवारी २८ एप्रिलला दुपारच्या सुमारास त्याचा साक्षगंधाचा कार्यक्रम होणार होता व मंगळवारी २९ एप्रिलला मंडप पूजन होते.अशातच राहुल हा २८ एप्रिलच्या पहाटे कुणालाही काहीही न सांगता घरून निघून गेला होता.कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी इतरत्र शोध घेतला.मात्र,त्याचा थांगपत्ताच लागलेला नव्हता. त्यामुळे कुटुंबीयांनी पोलीस ठाणे गाठून मिसिंगची तक्रार दाखल केली होती. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गोबरवाही पोलीस प्रशासन राहुलच्या शोधात होते. अशातच त्याचे प्रेत गावालगतच्या शेतातील विहिरीत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे.सर्वत्र शोध सुरू असतांनाच गुरुवार १ मे रोजी सकाळी आठ वाजता गावालगत शेतामधील विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला.पोलिसांना माहिती कळविल्यावर पंचनामा करून पोलिसांनी विहिरीतून मृतदेह बाहेर काढला.त्याच्या शरीरावर कोणत्याही खुणा अथवा व्रण आढळून आले नाहीत.मृतदेहाचे शवविच्छेदन तुमसर येथे करण्यात आले.मृत्यूचे कारण अद्यापही कळलेले नसून त्याने आत्महत्या केली असावी,असा कयास बांधला जात आहे.
- Advertisement -

