- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासक राज सुरू आहे.त्यामुळे तुम्हाला निवडणुका घ्यायच्याच नाहीत का? असा प्रश्न विचारत सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका थांबवण्याचे कारण वाटत नसल्याचे स्पष्ट केल्याने अखेरस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना मुहूर्त मिळाला आहे.कारण येत्या चार महिन्यात निवडणुका घ्या,असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून या निवडणुका लागतील.चार आठवड्यांच्या आत निवडणुकांची घोषणा होईल.तर सप्टेंबर महिन्यापर्यंत निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. राज्यातील महापालिकांच्या निवडणुका करोना काळापासून घेण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे सर्व महापालिकांमध्ये प्रशासकांद्वारे कारभार सुरु आहे.त्यामुळे जवळपास पाच वर्षांपासून रखडलेल्या विविध महापालिका,जिल्हा परिषद,पंचायत समित्या, नगर पंचायत निवडणुका घेण्यास हिरवा कंदील मिळाला आहे.सध्या विविध स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक राज आहे.ओबीसी आरक्षणामुळे निवडणुकांचा प्रश्न जैसे थे ठेवण्यात आला होता.मात्र आता निवडणूक घ्यायला सुरुवात करा,नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका घ्यायच्या की जुन्यानुसार,ओबीसी आरक्षण यासारख्या मुद्द्यांवर सुनावण्या होत राहतील.मात्र येत्या चार आठवड्यात निवडणुकीची अधिसूचना काढण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. राज्य सरकारनेही कुठलेही आक्षेप नसल्याचे सांगितले. त्यामुळे चार महिन्यात निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
- Advertisement -

