Friday, July 17, 2026
Homeचंद्रपूरअखेर नियमभंग केल्याप्रकरणी आमदारांकडून पाच हजाराचा दंड वसूल..

अखेर नियमभंग केल्याप्रकरणी आमदारांकडून पाच हजाराचा दंड वसूल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र
प्रकल्पात वन्यजीवांचे संरक्षण आणि पर्यटनाची शिस्त राखण्यासाठी कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. विशेषतः जंगल सफारीदरम्यान मोबाईल फोन वापरणे अथवा जवळ बाळगण्यावर सक्त मनाई करण्यात आली आहे.नियमभंग केल्यास संबंधित पर्यटकांवर दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद आहे.दरम्यान,चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार करण देवतळे यांनी ताडोबा बफर क्षेत्रातील निमडेला पर्यटन गेटवरून ३० जानेवारी रोजी सपत्नीक जंगल सफारी केली होती.या सफारीदरम्यान त्यांनी मोबाईल फोनचा वापर केल्याचा प्रकार समोर आला. विशेष म्हणजे,त्यांनी तयार केलेली एक रिल सोशल मीडियावर पोस्ट केली होती.त्या व्हिडिओमध्ये जिप्सीच्या आरशात मोबाईल फोन दिसून आल्याने सफारीदरम्यान मोबाईल वापरल्याचे स्पष्ट झाले होते.अश्यातच सदरचा व्हिडिओ समोर आल्यानंतर ताडोबा प्रशासनाकडून कारवाई होणार का?याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सर्वसामान्य पर्यटकांकडून नियमभंग झाल्यास ताडोबा प्रशासन तात्काळ दंडात्मक कारवाई करते.त्यामुळे आमदारांवरही समान नियम लागू होणार काय?असा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला असतांनाच अखेर ताडोबा-अंधारी टायगर रिझर्व कंझर्वेशन फाउंडेशन,चंद्रपूर यांच्या वतीने या प्रकरणाची दखल घेऊन आमदार करण देवतळे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.सफारीदरम्यान मोबाईल फोनचा वापर केल्याप्रकरणी त्यांच्याकडून ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याचे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महामार्गाच्या मध्यभागी आलेले पाणीपुरवठा योजनेचे चेंबर धोकादायक; संबंधित विभागाचे दुर्लक्ष.. – रविंद्र गोटेफोडे यांची तातडीने स्थलांतराची मागणी

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा शहरातून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५४३ च्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे चेंबर थेट रस्त्याच्या मध्यभागी आल्याने गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला...

सर्पदंश झाल्यास काय करावे आणि काय करू नये,घ्या जाणून.. – गडचिरोली जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत एकूण १३४ सर्पदंशाच्या घटनांची नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पावसाळ्याच्या दिवसांत शेतीची कामे वाढल्यामुळे आणि बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे सापांचा मानवी वस्तीत व शेतात वावर वाढतो.गडचिरोली जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र व जंगलाचे...

शिवराजपूर येथे रस्ता दुतर्फा वृक्ष लागवडीच्या कामास प्रारंभ..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- “सामुहिक वन हक्क क्षेत्र विकास हीच आमची आस,गावातील लोकांना गाव शिवारातच लावू रोजगाराची कास" या उद्देशाने देसाईगंज तालुक्याच्या शिवराजपूर येथील सामुहिक वन...

बापरे..! घराबाहेर उभ्या असलेल्या चिमुकलीवर मोकाट कुत्रे तुटून पडली..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-बऱ्याच ठिकाणच्या शहरात तसेच ग्रामीण भागात मोकाट कुत्र्यांची मोठी फौज पाहायला मिळते. काही मोकाट कुत्रे हल्ल्यांपासून चार हात दूरच असतात, तर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!