उद्रेक न्युज वृत्त :-ज्येष्ठ उद्योगपती,पद्मविभूषण रतन टाटा यांचे निधन झाल्याने त्यांना आज,गुरुवार दिनांक-१० ऑक्टोंबर रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत शोक प्रस्ताव मांडला.यावेळी रतन टाटा यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याचा प्रस्ताव यावेळी सर्वानुमते संमत करण्यात आला.तसेच आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल काही दिवसांतच वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने विविध निर्णयांचा धडाका लावला आहे.अशातच आता सत्ताधारी सरकारने राज्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये पाळणाघरे सुरू करण्यात येणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.सह्यांद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते
मंत्रिमंडळ निर्णय; आता अंगणवाडी केंद्रांमध्ये सुरू होणार पाळणाघरे…
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

