Tuesday, September 8, 2026
Homeदेसाईगंजआनंदावर पडले विरजण; 'आनंदाचा शिधा' मिळालाच नाही..!

आनंदावर पडले विरजण; ‘आनंदाचा शिधा’ मिळालाच नाही..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-राज्य शासनाने मोठ्या गाजावाजात गौरी-गणपती उत्सवानिमित्त राशन दुकानातून चार जिन्नस असलेला आनंदाचा शिधा गरीब पात्र लाभार्थींना देण्याची घोषणा केली होती.अशातच गौरी-गणपती उत्सव संपल्यानंतरही देसाईगंज तालुक्यात आनंदाचा शिधा मिळाला नसल्यामुळे लाभार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसले गेल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
राज्य सरकार विविध सणानिमित्त पात्र लाभार्थ्यांना प्रत्येकी एक किलो रवा,चणाडाळ,साखर आणि एक लिटर सोयाबीन तेल,असा ‘आनंदाचा शिधा’ देत असते.यावेळी गौरी-गणपती उत्सवानिमित्त आनंदाचा शिधा देण्याचे जाहीर करण्यात आले होते.त्यानुसार अनेक पात्र लाभार्थी गृहिणींनी गोड पक्वान्न बनविण्याचे निश्चित केले होते.परंतु आनंदाचा शिधा वेळेवर उपलब्ध झालाच नसल्याने दिलेली घोषणा पूर्णपणे फोल ठरली आहे.अशातच आता पात्र लाभार्थी  ‘आनंदाचा शिधा’ मिळणार कधी? अशी आशा बाळगून आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक; सहा जणांचा जागीच मृत्यू,तर सात जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गोंदिया-बालाघाट राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गोंदिया-बालाघाट मार्गावरील नागरा परिसरात एका भरधाव ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार...

शासकीय शुल्काव्यतिरिक अतिरिक्त रकमेची मागणी; केवळ १५० रुपये घेतांना सेतू केंद्र चालकाला रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नागरिकांना वेळेत व तात्काळ शासकीय प्रमाणपत्रे मिळावीत,यासाठी ऑनलाईन सेतू केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.मात्र,काही सेतू केंद्र चालक मनमानी कारभार करून शासकीय...

गावाजवळच दर्जेदार शिक्षण; चार शाळा बनणार ‘मॉडेल शाळा’..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासीबहुल आणि दुर्गम एटापल्ली तालुक्यातील विद्यार्थ्यांना गावाजवळच आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि सर्वांगीण शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यातील चार शाळा ‘मॉडेल शाळा’...

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत; राज्यातील सर्व सहा विभागांना देणार प्रत्यक्ष भेटी.. – थेट संवादासह आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या ई-मेलवर...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!