Wednesday, September 2, 2026
Homeनागपूरहातात मोबाईल अन् कानात इअर फोन घालून रेल्वे रुळावरून जातांना अनर्थ घडला…-१७...

हातात मोबाईल अन् कानात इअर फोन घालून रेल्वे रुळावरून जातांना अनर्थ घडला…-१७ वर्षीय विद्यार्थ्याचा घटनास्थळीच मृत्यू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :- रेल्वे रुळावरून पायी चालत शेताकडे जात असलेल्या विद्यार्थ्याला धावत्या रेल्वेने जोरात धडक देत फरफटत नेले.यात डोके शरीरापासून वेगळे झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.त्याच्या कानात मोबाइल फोनचे इअर फोन होते; अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली.ही घटना रामटेक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मनसर शिवारात काल,शुक्रवारी दि.५ ला सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.

आर्यन किशोर केकती वय १७ वर्षे,रा.मनसर, ता. रामटेक असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे.आर्यन शुक्रवारी सकाळी सायकलने एकटाच शेतात गेला होता.त्याने सायकल रेल्वे रुळालगत उभी केली आणि पायी शेताच्या दिशेने निघाला.त्यातच रामटेकहून नागपूरला वेगात जाणाऱ्या रेल्वेगाडीने त्याला जोरात धडक दिली.तो गाडीसोबत किमान ५० फुटांपर्यंत फरफटत गेला आणि नंतर चाकाखाली आला.त्यामुळे डोके शरीरापासून वेगळे झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

आर्यनने यावर्षीच दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्याला धाकटा भाऊ असून,आई व वडील शेतीसोबतच मजुरीचे काम करतात.आर्यन आईवडिलांना कामात हातभार लावायचा.माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि आर्यनचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रामटेक शहरातील उपजिल्हा रुग्णालयात नेले. याप्रकरणी रामटेक पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!