Saturday, June 20, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता विवाहासाठी करावी लागणार दोन महिने प्रतीक्षा….

आता विवाहासाठी करावी लागणार दोन महिने प्रतीक्षा….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- उन्हाळ्यात सुट्ट्यांमुळे सर्वत्र लग्नसराईची धूम असते.मात्र,यंदा मोजक्या लग्नमुहूर्तामुळे लग्न जमलेल्या उपवर- वधूंची चांगलीच गोची झाली आहे. यंदा एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात लगबगीने विवाह पार पडले.तर मे महिन्यात हिंदू पंचांगानुसार १ व २ मे या दोन दिवशी लग्न मुहूर्त होते.आता एकदम दोन महिन्यानंतर तिथी आहेत.त्यामुळे मुहूर्त व तिथीनुसार लग्नबेडीत अडकणाऱ्यांना वाट पाहण्यावाचून पर्याय नाही.

३ मे ते ३१ मे या संपूर्ण महिन्यामध्ये गुरू व शुक्र दोघांचा लोप असल्याने या कालावधीत विवाह तिथी नाही.तर १ जून ते ११ जूनदरम्यान गुरू व शुक्र लोप तर १२ जुन ते २८ जुन दरम्यान शुक्र लोप असल्याने शुभविवाह सोहळ्यास तिथी नाहीत.आपल्या नियोजनानुसार व सोयीनुसार मे व जून महिन्यात विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.तथापी दोन महिन्याच्या अवकाशानंतर एकदम जुलै महिन्यात विवाह मुहूर्त आहेत.परंतु, या कालावधीत दमदार पावसाला सुरूवात झालेली असते.यंदा पर्जन्यमान अधिक असल्याचा आधीच अंदाज वर्तविण्यात आला आहे.जुलै महिन्यात ९,११, १२,१३,१४,१५,१९,२१,२२, २३,२५, २६,२७,२८,३०, ३१ जुलै तर ऑगस्ट,सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये पावसाळा आणि चातुर्मासात विवाह सोहळ्यास तिथी नसल्याने दीपावली तुळशी विवाहानंतरच लग्नाचा बार उडणार आहे.

मे व जुन सलग दोन महिन्यांत शुभविवाह सोहळ्यास तिथी नसल्याने विवाहोच्छुक वर व वधूंना दोन महिने वाट बघावी लागणार आहे.तथापी काहींना पुरोहितांचा सल्ला घेऊन शुभ दिवसाचा उतारा यावर शोधला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

खतरनाक कारनामा..! नीट परीक्षेच्या विद्यार्थ्याला चक्क परदेशातील दिले परीक्षा केंद्र..

उद्रेक न्युज वृत्त नागपूर :-काही कालावधीपासून पेपरफुटी तसेच शिक्षणाच्या आयचा घो होत असल्याने होतकरू विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य धोक्यात येऊ लागले आहे.पालक वर्ग आपली मुले शिकून...

तीन तिघडा अन् काम बिघडा..! वन परिक्षेत्र अधिकारी,वनरक्षक व खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त गडचिरोली :-अनेकांना वाटतेय की,एखाद्या तिसऱ्याच व्यक्तींच्या माध्यमातून पैश्याची रक्कम घेतली,तर आपले नाव वा आपली करणी उजेडात येणार नाही.पण,लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तसला...

गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांमुळे लक्षणीय पाणीसाठा निर्माण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात मागील दोन वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत.या कामांमुळे जिल्ह्यात लक्षणीय पाणीसाठा निर्माण झाला असून...

आता भाडेपट्ट्यावरील शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखात असणार ‘महाराष्ट्र शासन’ कब्जेदार..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भाडेपट्ट्याने प्रदान करण्यात आलेल्या शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखातील नोंदी अधिक अचूक,पारदर्शक आणि एकसमान करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!