Sunday, September 20, 2026
Homeचंद्रपूरवाघाचा हल्ला; एकाचा मृत्यू..!

वाघाचा हल्ला; एकाचा मृत्यू..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांचे सत्र काही केल्या थांबेना.मानव वाघांच्या दडित जातो की,वाघ मानवांच्या दडित येतो,हेच कळेनासे झाले आहे.हल्ली मानवाची केवळ किंमत ठरवली जात असल्याने पुढील काळात काही वस्त्यांमध्ये मानवाचे वास्तव्य कमी आणि वाघोबांचेच राज्य दिसून येणार की काय?असा प्रश्न निर्माण झालेला असतांनाच चंद्रपूर जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील जनकापूर जंगल परिसरालगतच्या शेतात वाघाने हल्ला चढवून एका शेतकऱ्याला ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे.सदरची घटना काल मंगळवारी घडली असून घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.रमेश जयराम काशीवार वय ५५ वर्षे,असे वाघाच्या हल्ल्यात मृत पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.शेतकरी रमेश काशीवार हे दुपारच्या सुमारास जंगल परिसरालगत असलेल्या शेतावर गेले होते. दरम्यान,जंगल परिसरातून आलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला.हल्ल्यात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला.शेतावर गेलेले रमेश काशीवार सायंकाळ होऊनही घरी परतल्याने नसल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला.शोधादरम्यान ते शेतात मृतावस्थेत आढळून आले.यानंतर घटनेची माहिती तातडीने वन विभागाला देण्यात आली व पुढील प्रक्रिया पार पाडण्यात आली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव ट्रकची कारला मागून जोरदार धडक; दोघांचा करुण अंत,तर पाच जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील कोरधा गावाजवळ एक अत्यंत भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गावाकडे परत निघालेल्या कुटुंबीयांच्या कारला भरधाव ट्रकने मागून जोरदार...

क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद; बेदम मारहाणीत बापाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-अगदी क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद झाला खरी,पण रागाच्या भरात ३० वर्षीय मुलाने  वडिलांना काठीने बेदम मारहाण केल्याने मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या...

चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-मुंबईतील कोस्टल मार्गावर आज,रविवार २०  सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाला.मरीन ड्राईव्हकडून...

आता शेतकऱ्यांना मोबाइल ॲपद्वारेही करता येणार ई-पीक पाहणी नोंदणी..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाकडून महसूल विभागातील सहाय्यकांकडून ११ ऑगस्ट २०२६ पासून खरीप ई-पीक पाहणी सुरू करण्यात आली आहे.मात्र,काही तांत्रिक समस्येमुळे पीक पाहणीची प्रक्रिया अतिशय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!