Monday, May 25, 2026
Homeचंद्रपूरपरवानगी न घेताच नाटकांचे आयोजन करणे आयोजकांना भोवले- मंडळावर कायद्यानुसार प्रशासनाकडून गुन्हा...

परवानगी न घेताच नाटकांचे आयोजन करणे आयोजकांना भोवले- मंडळावर कायद्यानुसार प्रशासनाकडून गुन्हा दाखल

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

चंद्रपूर(मुल) :- मुल तालुक्यात ऑक्टोंबर ते एप्रिल या कालावधीत मोठ्या प्रमाणात नाटक,शंकर पट दंडार कार्यक्रम भरविण्यात येतात.त्याअनुषंगाने तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांच्याकडून आयोजकांनी नियमानुसार कार्यक्रमाची,प्रयोगाची परवानगी घेणे आवश्यक आहे.परंतु तालुक्यातील चिचाळा,भेजगाव येथील मंडळांनी विनापरवानगी नाटकाचे आयोजन केल्याने सदर मंडळावर कायद्यानुसार प्रशासनाकडून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

७ मार्च रोजी चिचाळा येथे आयोजित केलेल्या नाटकाची तसेच २२ मार्च रोजी भेजगाव येथे आयोजित केलेल्या नाटकाची परवानगी आयोजकांनी घेतली नव्हती.नाटकाला मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी लक्षात घेता याबाबत प्रशासनाला कल्पना असणे आवश्यक आहे.जेणेकरून कुठलाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. झाला तर प्रशासनास त्यावर वेळीच उपायोजना करता येईल. वर नमुद गावात कार्यक्रमाला परवानगी न घेता आयोजकांनी नाटकाचे आयोजन करत प्रचलीत कायदेशीर प्रक्रियेला बगल दिली असल्याने त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बलात्कार पीडितेचे नाव सार्वजनिक करणे पडले महागात.. – गृह विभागाचे प्रधान सचिव,पोलिस आयुक्त तसेच पोलिस निरीक्षक यांना उत्तर सादर करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बलात्कार पीडितेची किंवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलीची ओळख म्हणजेच नाव किंवा छायाचित्र जाहीर करणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या...

नागरिकांनो जीवाची काळजी घ्या; आजपासून नवतपाला सुरुवात.. – सर्वाधिक तापमानाचे नऊ दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-काही दिवसांपासून सूर्यदेवता विदर्भातील जीवसृष्टीवर कोपला की काय?अशी स्थिती निर्माण झाली आहे.सूर्य मोठ्या प्रमाणावर आग ओकू लागल्याने विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उष्ण...

नागरिकांनी लोकशाही दिनात तक्रारी व निवेदने सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन  येत्या,सोमवार १ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सभागृहात करण्यात आले आहे.जिल्ह्यातील नागरिकांनी...

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!