- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे आज,शुक्रवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.आत्माराम दसरू बोरकर वय ५२ वर्षे, रा.गिरगाव,ता.नागभीड,जि.चंद्रपूर असे वाघाच्या हल्ल्यात मृत पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
नेहमीप्रमाणे आत्माराम बोरकर यांनी काल,गुरुवार १८ जून रोजी गावालगतच्या जंगल परिसरात शेळ्या चराईसाठी नेल्या होत्या.दिवसभर शेळ्या चारून सायंकाळी शेळ्या घेऊन घरी परतले असता एक शेळी दिसून न आल्याने ते जंगल परिसरात गेले होते.रात्र होऊनही घरी परतले नसल्याने कुटूंबीयात चिंता पसरली. दरम्यान,आज जंगल परिसरात शोधमोहीम राबवली असता शोधादरम्यान त्यांचा मृतदेह जंगल परिसरात आढळून आला.घटनेची माहिती मिळताच एसीएफ महेश गायकवाड,आरएफओ ए.आर. कन्नमवार,आरओ हिंगणघर,पीआय राहुल गुहे पथकासह वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.वनविभागाने पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली.घटनेने परिसरात शोककळा पसरली असून जंगलालगतच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
- Advertisement -

