Thursday, August 6, 2026
Homeचंद्रपूरवाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे आज,शुक्रवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.आत्माराम दसरू बोरकर वय ५२ वर्षे, रा.गिरगाव,ता.नागभीड,जि.चंद्रपूर असे वाघाच्या हल्ल्यात मृत पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
नेहमीप्रमाणे आत्माराम बोरकर यांनी काल,गुरुवार १८ जून रोजी गावालगतच्या जंगल परिसरात शेळ्या चराईसाठी नेल्या होत्या.दिवसभर शेळ्या चारून सायंकाळी शेळ्या घेऊन घरी परतले असता एक शेळी दिसून न आल्याने ते जंगल परिसरात गेले होते.रात्र होऊनही घरी परतले नसल्याने कुटूंबीयात चिंता पसरली. दरम्यान,आज जंगल परिसरात शोधमोहीम राबवली असता शोधादरम्यान त्यांचा मृतदेह जंगल परिसरात आढळून आला.घटनेची माहिती मिळताच एसीएफ महेश गायकवाड,आरएफओ ए.आर. कन्नमवार,आरओ हिंगणघर,पीआय राहुल गुहे पथकासह वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.वनविभागाने पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली.घटनेने परिसरात शोककळा पसरली असून जंगलालगतच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

खासगी हॉस्पिटल्सचा संप; रुग्ण सेवा प्रभावित..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने (एमएमसी)'सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी' (सीसीएमपी)पूर्ण केलेल्या होमिओपॅथी(बीएचएमएस) डॉक्टरांना नोंदणी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राज्यभरातून वैद्यकीय असंतोषाचा वणवा...

तब्बल १५४ नवीन ‘आपले सरकार सेवा केंद्रे’ होणार स्थापन; अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात ग्रामपंचायत व नगर परिषद आणि नगर पंचायत स्तरावर तब्बल १५४ नवीन 'आपले सरकार सेवा केंद्रे' स्थापन करण्यासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात...

कोठी-पिपलीबुर्गी मार्गावरील पुलाच्या नुकसानीची होणार उच्चस्तरीय चौकशी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील हालेवारा-कोठी-रेगाडंडी-पिपलीबुर्गी मार्गावरील सा.क्र.६/९०० येथील मोठ्या पुलाच्या नुकसानीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदारी निश्चित करून चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर...

मुसळधार पावसाचा फटका..! मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यात अनेक ठिकाणी पडलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या विशेष सखोल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!