- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून राज्यातील तब्बल ५६ लाखाहून अधिकच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार असून सरकारने शेतकऱ्यांसाठी ३६ हजार ५८५ कोटींची कर्जमाफी जाहीर केली आहे.आज, मंगळवार २ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक पार पडली.या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी कर्जमाफीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.मात्र,राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे निर्णयाची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली नाही.कर्जमाफी संदर्भात सहकार विभागाकडून अटी व शर्ती संदर्भात परिपत्रक काढण्यात येणार आहे.या अटी व शर्तीनंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे.अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर यासाठी समिती गठीत करण्यात आली होती.या समितीने आपला अहवाल मुख्यमंत्र्याकडे सादर केल्यानंतर आज मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.दोन लाखापर्यंतचे कर्ज सरकार माफ करणार असून नियमित पिक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचा प्रोत्सानपर निधी देखील दिला जाणार आहे.
- Advertisement -

