Tuesday, June 2, 2026
Homeमुंबईआता फसव्या जाहिराती करणाऱ्या हिरो-हिरोईनवरही होणार कारवाई..

आता फसव्या जाहिराती करणाऱ्या हिरो-हिरोईनवरही होणार कारवाई..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या  आयुक्तपदी सोमवार,२५ मे २०२६ रोजी राज्यातील धडाधडीचे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे विराजमान होताच मुंढे यांनी कारवाईचा सपाटा सुरू करून मुंबई,नवी मुंबई,पुणे,कोल्हापूर,सांगली,सातारा, नाशिक, बीड,जालना,नांदेड,परभणी,सोलापूर,छत्रपती संभाजीनगर,अमरावती,अकोला,वाशिम,नागपूरसह  अनेक जिल्ह्यांतील विविध आस्थापनांवर कारवाई करण्यात आली.या कारवाईत गूळ,खवा,बुंदी लाडू,बेकरी पदार्थ,कँडी,खाद्यतेल,तूप,खजूर,आईस्क्रीम,फ्रोजन डेझर्ट,मसाले,शेंगदाणा चिक्की आदी पदार्थांची तपासणी केली होती.या कारवाईत तब्बल ८४ हजार ३३५ किलो संशयित अन्नसाठा जप्त करण्यात आला.या जप्त मालाची किंमत सुमारे ९७ लाख १९ हजार ९६३ रुपये असून संशयित अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठवले गेले आहेत.त्याचबरोबर,पुण्यात ३ ठिकाणी गुळामध्ये साखरेची भेसळ आढळली आहे. त्यामुळे गुळाचा १५ हजार ९६ किलो साठा जप्त करण्यात आला आहे.तसेच नवी मुंबईत आंबा विक्रीसाठी रासायनिक द्रव्यांचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आले आहे.यामध्ये २९ लाख २२ हजार ५७० रुपये किंमतीचे आंबे जप्त करण्यात आले आहेत.काही ठिकाणी अस्वच्छ उत्पादन प्रक्रिया आणि दिशाभूल करणारे पॅकिंग उघड करण्यात आले आहेत. अश्यातच तुकाराम मुंडे आता ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या आणि खोटे दावे करणाऱ्या जाहिरातींवर अधिक कडक कारवाई करणार आहेत.चुकीची माहिती देणाऱ्या जाहिरातींमध्ये सहभागी कलाकारांवरही कारवाई केली जाईल.ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या जाहिरातींमुळे अनेक नागरिक आर्थिक नुकसान सोसतात.काही कंपन्या उत्पादनांबाबत दिशाभूल करणारे दावे करून ग्राहकांना आकर्षित करतात.अशा जाहिरातींमध्ये प्रसिद्ध व्यक्तींचा सहभाग असल्याने ग्राहकांचा विश्वास अधिक वाढतो.त्यामुळे अशा जाहिरातींची जबाबदारी केवळ कंपन्यांवरच नव्हे तर त्यांचा प्रचार करणाऱ्या व्यक्तींवरही निश्चित केली जाणार आहे.ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करणे हे सरकारचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे मुंढे यांनी नमूद केले.डिजिटल माध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सकडून केल्या जाणाऱ्या जाहिरातींवरही विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. नागरिकांनी कोणतेही उत्पादन खरेदी करण्यापूर्वी त्याची माहिती तपासून पाहावी आणि संशयास्पद जाहिरातींबाबत संबंधित यंत्रणांकडे तक्रार करावी, असेही आवाहन त्यांनी केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रेतीने भरलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीचा हुक काढत असतांनाच अपघात; तरुणाचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकामासाठी ट्रॅक्टरद्वारे आणलेली रेती खाली करण्यासाठी ट्रॉलीचा मागील हुक काढत असतांनाच घडलेल्या अपघातात एका २३ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना...

आंघोळ करण्यासाठी नाल्यातील पाण्यात उडी मारताच बुडाला.. – शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-ब्रहपुरी शहराच्या जानी वॉर्ड येथील रहिवासी असलेल्या एका १६ वर्षीय शाळकरी मुलाचा आंघोळीसाठी नाल्यातील पाण्यात उडी मारताच बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना...

अखेर शेतकरी कर्जमाफीला मंत्रिमंडळाची मंजुरी; ५६ लाख शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून राज्यातील तब्बल ५६ लाखाहून अधिकच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार असून सरकारने शेतकऱ्यांसाठी ३६ हजार...

राज्यातील तब्बल ८० लाख लाडक्या बहिणी अपात्र होण्यामागचे खरे कारण आले समोर..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यावर आलेल्या आर्थिक संकटामुळे मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची नावे कपात करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.पण,सरकारने स्पष्ट केले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!