- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील बऱ्याच वर्षांपासून स्थगित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिका,नगर परिषद तसेच १२ जिल्हा परिषद व १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका पूर्ण केल्या असून त्या ठिकाणी विविध पदाधिकारी वेगवेगळ्या पदांवर विराजमान झाले आहेत.अशातच विदर्भ आणि मराठवाड्यातील तब्बल २० जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्याचा प्रयत्न सुरू असतांनाच सर्वोच्च न्यायालयाने ५० टक्के ओबीसी आरक्षणाचे उल्लंघन करणाऱ्या जिल्हा परिषदेतील जोपर्यंत निकाल लागत नाही,तोपर्यंत तेथील निवडणुका घेऊ नयेत,असा आदेश दिला.प्रकरणी निवडणुका लांबणीवर गेल्याने सर्वोच्च न्यायालयाने सरन्यायाधीश सुर्यकांत यांच्या अध्यक्षतेखाली तीन न्यायाधिशांचे खंडपीठ गठीत करण्यात आले आहे.या खंडपीठासमोर येत्या,२१ आणि २२ जुलै २०२६ रोजी सुनावणी होणार आहे.सुनावणीत उर्वरित जिल्हा परिषदेतील निवडणुकांसंदर्भात पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याने तोपर्यंत जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होऊ शकणार नसल्याने आता निवडणुकांसाठी जुलै महिन्यापर्यंत वाट पहावी लागणार असल्याचे चित्र आहे.
- Advertisement -

