- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-सिंथेटिक पाईप जवळच असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग लागून आगीने रौद्ररूप धारण केल्याची घटना आज,सोमवार २ मार्च रोजी सकाळच्या सुमारास नागपूर शहरातील नरसाळा परिसरातील चाणक्यपूरम परिसरात घडली.सदरची आग लोकवस्तीपर्यंत पोहचणार तोच मदतीसाठी वेळीच धावा केल्याने मोठा अनर्थ टळला.यात जीवितहानी टळली असली तरीही तब्बल ७०० सिंथेटिक पाईप जळून खाक झाल्याने कंत्राटदाराचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
नरसाळा परिसरातील एका पाण्याच्या टाकीखाली मोठ्या प्रमाणात सिंथेटिक पाईप साठवून ठेवण्यात आले होते.आज सोमवारी सकाळी या पाईप जवळ असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याला अचानक आग लागली.सदरची आग वेगाने पसरत पाईप ठेवलेल्या ठिकाणापर्यंत पोहचली आणि पाईपवरील रबराच्या आवरणामुळे आगीने भीषण रूप धारण केले आणि अवघ्या काही मिनिटांतच परिसरात काळेकुट्ट धुराचे लोट पसरले.तब्बल अर्धा तास परिसरात धुराचे साम्राज्य असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. लागलीच स्थानिक नागरिकांनी अग्निशमन विभागाला पाचारण केले.घटनेची माहिती मिळताच काही मिनिटांत अग्निशमन दलाचे तीन वाहन पथकासह घटनास्थळी दाखल झाले.युद्धपातळीवर प्रयत्न करत आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवल्याने अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळली.सदरची आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नसून सर्वप्रथम कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग लागून ती हळूहळू पसरत जाऊन आगीने रौद्ररूप धारण केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे वा कुणीतरी जाणून बुजून आग लावली असावी,अशी शक्यता नाकारता येणार नाही,अशी शंका परिसरातील नागरिकांनी उपस्थित केली आहे.
- Advertisement -

