Friday, May 1, 2026
Homeभंडाराराज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा भंडारा जिल्हा दौऱ्यावर..

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा भंडारा जिल्हा दौऱ्यावर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

भंडारा :-येत्या,मंगळवार १७ फेब्रुवारी रोजी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत.या दौऱ्यात महिलांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हा नियोजन भवन येथे सकाळी ११ वाजता विशेष जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे.या जनसुनावणीच्या माध्यमातून जिल्ह्यातील पीडित महिलांना आपले प्रश्न थेट आयोगासमोर मांडता येणार आहेत.यावेळी महिलांच्या विविध समस्यांवर निर्णय घेण्यात येणार आहे.या सुनावणीसाठी जिल्ह्यातील पीडित महिलांना कोणतीही पूर्वसूचना न देता प्रत्यक्ष उपस्थित राहता येईल.महिला त्यांच्या मालमत्ताविषयक तक्रारी,कौटुंबिक हिंसाचार किंवा इतर कायदेशीर समस्यांविषयीची प्रकरणे लेखी स्वरूपात आयोगापुढे सादर करू शकतील.महिलांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने या सुनावणीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अरुण बांदुरकर यांनी दिली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

महाराष्ट्र राज्याचा ६७ वा स्थापना दिन उत्साहात साजरा.. महाराष्ट्र दिनी “समृद्ध गडचिरोली” घडविण्याचा संकल्प..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी “समृद्ध गडचिरोली” घडवण्याचा संकल्प व्यक्त करत विकास, शांतता...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!