Monday, May 25, 2026
Homeचंद्रपूरभीषण कार अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू; तर चारजण गंभीर जखमी..

भीषण कार अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू; तर चारजण गंभीर जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-परतीच्या प्रवासात असलेल्या कारचा भीषण अपघात होऊन कारखाली दबून राहिल्याने १२ वर्षीय चिमुकलीसह चार महिलांचा जागीच मृत्यू झाला,तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,गुरुवार २५ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातील सोंडो गावाजवळ घडली.अक्सा शबरीन शेख वय १२ वर्षे,सलमा बेगम झांकीर हुसेन वय ४६ वर्षे,अफजल बेगम वय ५५ वर्षे, सायरा बानो वय ४५ वर्षे यांचा जागीच मृत्यु झाला तर शाहीन निशा वय ३७ वर्षे,नजत बेगम वय ४८ वर्षे, नुसरत बेगम वय ४५ वर्षे व अब्दुल्ल अरहान अशी गंभीर जखमींची नावे असून २८ वर्षीय कार चालक अब्दुल रहमान आश्चर्यकारकरित्या सुखरूप बचावला आहे.अपघातातील मृतक व जखमी हे तेलंगणा राज्यातील कागजनगर येथील रहिवासी असून ते  नागपुर येथील नातेवाईक यास्मीन बानो यांच्या भेटीकरीता तसेच इतर कामांसाठी गेले होते.
नागपूर येथील कामे आटोपून सर्वजण टीएस ०२ ईएन ५५४४ क्रमांकाच्या अर्टिका कारने त्यांच्या स्वगावी निघाले होते.अशातच परतीच्या प्रवासात असतांनाच  राजुरा तालुक्यातील सोंडो गावाजवळ येताच पहाटे दीड वाजेच्या दरम्यान कार चालकाच्या डोळ्यावर झापड (डुलकी)आल्याने त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार पुलावरून थेट नाल्यातील खड्ड्यात कोसळली. अपघात इतका भीषण होता की,कोसळलेल्या कारचा आवाज सोंडो गावापर्यंत ऐकू आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.घटना घडताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ घटनेची माहिती राजुरा पोलिसांना दिली.पोलिसांनी घटनास्थळ गाठून बचावकार्य सुरू केले.मात्र, उंचावरून कोसळलेली कार उलटी असल्याने कार मधुन जखमींना बाहेर काढणे अशक्य झाले. त्यामुळे पोलिस उपनिरीक्षक पराग उल्लीवार व पथकाने  महामार्ग निर्माण कंपनीच्या सहकार्याने कटरच्या सहाय्याने कारचा काही भाग कापुन जखमींना बाहेर काढले.तोपर्यंत चार जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर चार जण गंभीर जखमी झाले.प्रकरणी राजुरा पोलिसांनी अपघाताची नोंद घेत मृतांचे शव उत्तरीय तपासणीसाठी राजुरा उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. तर प्राथमिक उपचारानंतर जखमींना चंद्रपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले.प्रकरणी चालक अब्दुल रहमान याच्यावर कलम २८१,२२५(बी),१०६(१) बीएनएस तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास ठाणेदार सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक पराग उल्लीवार करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बलात्कार पीडितेचे नाव सार्वजनिक करणे पडले महागात.. – गृह विभागाचे प्रधान सचिव,पोलिस आयुक्त तसेच पोलिस निरीक्षक यांना उत्तर सादर करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बलात्कार पीडितेची किंवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलीची ओळख म्हणजेच नाव किंवा छायाचित्र जाहीर करणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या...

नागरिकांनो जीवाची काळजी घ्या; आजपासून नवतपाला सुरुवात.. – सर्वाधिक तापमानाचे नऊ दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-काही दिवसांपासून सूर्यदेवता विदर्भातील जीवसृष्टीवर कोपला की काय?अशी स्थिती निर्माण झाली आहे.सूर्य मोठ्या प्रमाणावर आग ओकू लागल्याने विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उष्ण...

नागरिकांनी लोकशाही दिनात तक्रारी व निवेदने सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन  येत्या,सोमवार १ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सभागृहात करण्यात आले आहे.जिल्ह्यातील नागरिकांनी...

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!