Monday, May 25, 2026
Homeचंद्रपूरआमदार बंटी भांगडिया यांच्यासह आठ कार्यकर्त्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

आमदार बंटी भांगडिया यांच्यासह आठ कार्यकर्त्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :- जिल्ह्यातील चिमूर विधानसभेचे भाजप आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रपूर येथील काँग्रेस जिल्हा सरचिटणीसाचा भाऊ आणि त्यांच्या पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चिमुर पोलिस ठाण्यात हा गुन्हा नोंद करण्यात आला असून यामुळे दोन्हीकडील कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर मतदारसंघाचे भाजप आमदार बंटी भांगडिया आणि त्यांच्या ८ कार्यकर्त्यांवर मारहाण,शिवीगाळ आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल दाखल झाला आहे.तर आमदार भांगडिया यांच्या तक्रारीवरून फिर्यादी साईनाथ बुटके यांच्यावरही शिवीगाळ आणि बदनामी केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.साईनाथ बुटके या काँग्रेस समर्थकाने त्याच्या व्हाट्सएप स्टेटसवर आमदार बंटी भांगडीया यांची आणि त्यांच्या परिवाराची बदनामी करणारा मजकूर पोस्ट केला होता.त्यामुळे संतापलेल्या बंटी भांगडीया आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी काल रात्री साईनाथ बुटके यांना घरी जाऊन मारहाण केल्याचा आणि त्यांच्या पत्नीला शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.दरम्यान, आमदारांविरोधात गुन्हा दाखल करणाऱ्या साईनाथ बुटके यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी रात्री उशिरापर्यंत भाजप कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या दिला होता.यामुळे चिमूर येथे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागरिकांनो जीवाची काळजी घ्या; आजपासून नवतपाला सुरुवात.. – सर्वाधिक तापमानाचे नऊ दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-काही दिवसांपासून सूर्यदेवता विदर्भातील जीवसृष्टीवर कोपला की काय?अशी स्थिती निर्माण झाली आहे.सूर्य मोठ्या प्रमाणावर आग ओकू लागल्याने विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उष्ण...

नागरिकांनी लोकशाही दिनात तक्रारी व निवेदने सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन  येत्या,सोमवार १ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सभागृहात करण्यात आले आहे.जिल्ह्यातील नागरिकांनी...

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

रोजगार हमी योजनेच्या कायद्याची जागा घेणाऱ्या ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत १२५ दिवस काम देण्याची हमी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-२००५ कायद्याची जागा आता 'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!