- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष वाढलेला असून एक दिवसाआड वाघाच्या हल्ल्यात म्हणा नाहीतर एखाद्या हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात जीव गमावलेला वा गंभीर जखमी झाल्याची कुठली ना कुठली तरी घटना उघडकीस येऊ लागली आहे.आतापर्यंत घडलेल्या घटनांमध्ये केवळ पैसा दिला जात असल्याने मानवांच्या अमूल्य जीवनाची किंमत केवळ पैश्यापुरतीच मर्यादित राहिलेली आहे.त्यामुळे धर्तीवर केवळ हिंस्त्र प्राण्यांचाच राज चालणार की काय? अशी म्हणण्याची वेळ येऊ नये.काल गुरुवारी एकाच दिवशी दोन ठिकाणी वेगवेगळ्या घटना घडल्या असून त्या केवळ हिंस्त्र प्राण्यांच्या उपद्रवाच्याच.सकाळच्या सुमारास एका महिलेस वाघाने ठार केले तर सायंकाळच्या सुमारास बिबट्याने एका आठ वर्षीय चिमुकल्यास उचलून नेत ठार केले.
पहिली घटना चिमूर तालुक्याच्या शंकरपुर पासून सहा किलोमिटर अंतरावर असलेल्या लावारी गावाजवळ काल गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास शेतात काम करणारी महिला वाघाच्या हल्ल्यात ठार झाली.सदरची घटना चिमूर वनपरिक्षेत्रातील भिसी उपवन क्षेत्रातील गडपिपरी बिटात घडली.यात ४० वर्षीय विद्या कैलास मसराम मृत पावली.
दुसरी घटना सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथे काल गुरुवारी सायंकाळी साडे सात वाजताच्या सुमारास घडली.घरासमोर आपल्या काकासोबत उभा असलेल्या एका आठ वर्षीय मुलाला बिबट्याने उचलून नेले.प्रशिक बबन मानकर रा.गडबोरी,ता.सिंदेवाही, जि.चंद्रपूर असे चिमुकल्याचे नाव आहे.प्रशिक हा आपल्या काका नंदकिशोर मानकर यांच्यासोबत गावातील मस्कऱ्या गणपतीच्या जेवणासाठी गेले होते. जेवण करून घरी आले.काका थोडे दूर होताच बिबट्याने प्रशिकला तोंडात पकडून टेकडीवरील झुडपात नेले.प्रशिक व बिबट्याचा टेकडी परिसरात शोध घेतला असता प्रशिकचा पॅन्ट व काही ठिकाणी रक्ताचे डाग आढळून आले.मात्र,त्याचा पत्ताच लागलेला नव्हता.रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरूच होती.दोन्ही घटनेने चंद्रपूर जिल्हा हिंस्त्र प्राण्यांच्या विळख्यात सापडल्याचे दिसून येते
- Advertisement -

