उद्रेक न्युज वृत्त :-कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या जाणार,असे वक्तव्य करीत असतात.यापूर्वी कर्जमाफीच्या विधानावरून त्यांच्यावर टीकेची झोड उडाली होती. कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैश्याचे काय कराल?तर कधी ‘हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का?’, एकदा त्यांनी स्वतःच्याच मंत्रिपदाबाबत विधान करत ‘कृषिमंत्रीपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी’, असे ते म्हणाले होते.अश्यातच आता नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी विधानसभा अधिवेशनादरम्यान मोबाईलवर रमी खेळण्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या संपूर्ण प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि कोकाटे यांच्या बाबतीत पक्ष योग्य निर्णय घेईल,असे म्हटले आहे.शेतकरी संकटात असतांना कृषी मंत्रालयासारख्या संवेदनशील विभागाच्या मंत्र्यांनी खूप गांभीर्याने काम करावे. कोकाटे यांच्या वतीने जे घडले ते पूर्णपणे अयोग्य आहे.अजित पवार यांनी पीक विमा आणि कर्जमाफीसारख्या मुद्द्यांवर यापूर्वी केलेल्या वादग्रस्त विधानांवर मंत्री कोकाटे यांना इशारा दिला होता. आता रमी खेळण्याच्या व्हिडिओवर कोकाटे यांनी स्पष्टीकरण देणे चुकीचे आहे.शेतकऱ्यांच्या संकटाच्या वेळी असे बेजबाबदार वर्तन स्वीकारार्ह नाही.त्यामुळे येत्या काळात राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद धोक्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद धोक्यात.. – मोबाईलवर ऑनलाईन रम्मी खेळणे भोवणार..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

