उद्रेक न्युज वृत्त :-राज्याचे पावसाळी अधिवेशन संपले असून सध्या स्थितीत राज्याचे मंत्री आणि विधानसभा क्षेत्राचे आमदार आपल्या क्षेत्रातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी फेरफटका मारतांना दिसून येत आहेत.अश्यातच शिंदे सेनेचे नेते व राज्याचे वाहतूक मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले असतांना त्यांना मराठा समाजाच्या मोठ्या रोषाला सामोरे जावे लागले.मराठा समाजाला दिली जाणारी कुणबी प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्रे दिली जात नसल्याने मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. धाराशिवमध्ये रेस्ट हाऊसच्या बाहेरच मंत्री प्रताप सरनाईक यांना घेराव घालून आमचे प्रश्न सोडवा मगच रेस्ट हाऊसमध्ये जा,असा आक्रमक पवित्रा घेत आंदोलकांनी जवळपास पंधरा मिनिटे पालकमंत्र्यांचा रस्ता अडवून धरला.यावेळी आंदोलक आणि मंत्री सरनाईक यांच्यात शाब्दिक झाली.धाराशिव जिल्ह्यात अनेक अर्जदारांकडे कुणबी असल्याचे पुरावे असूनही जात वैधता समितीकडून प्रमाणपत्रे नाकारली जात आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.प्रवेश प्रक्रिया सुरू असतांना प्रमाणपत्र न मिळाल्याने अनेकांना प्रवेश व शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागत आहे,असा आरोप मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी केला.आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मंत्री सरनाईक यांनी जात वैधता समितीच्या अधिकाऱ्यांना फोन करून खडसावले.या प्रकरणात मी याआधीही दोन वेळा फोन केला होता.त्यावेळी मराठा समाजाच्या ज्या काही समस्या आहेत,त्या सोडवण्याचे आश्वासन तुम्ही दिले होते.दीड महिना उलटून गेला तरी अजून निर्णय का घेतले नाहीत?असा सवाल करत त्यांनी अधिकाऱ्यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली.
कुणबी प्रमाणपत्रासाठी पालकमंत्र्यांना घेराव; कार्यकर्ते आक्रमक..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

