- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीचे मतदान २० नोव्हेंबर २०२४ ला पार पडले.तर २३ नोव्हेंबर २०२४ ला मतमोजणी होऊन आमदारकीचा निकाल जाहीर करण्यात आला. राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सर्वात जास्त आमदार निवडून आल्याने अनेकांनी ईव्हिएम मशीनला दोष दिले.तर काहींनी बोगस मतदानामुळे महायुतीची सत्ता स्थापन झाल्याचे आरोप-प्रत्यारोप करण्यात आले होते.त्यानुसार भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आमदार सुधीर मुनगंटीवार,आमदार बंटी भांगडिया,आमदार देवराव भोंगळे व आमदार मोहन मते यांच्या
विधानसभेच्या निवडणूकीतील विजयी निकालावर काँग्रेसचे पराभूत उमेदवार प्रफुल्ल गुडधे,गिरीश पांडव,सतीश वारजूरकर,संतोषसिंग रावत व सुभाष धोटे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती.याचिकेत निवडून आलेले भाजपाचे हे सर्व आमदार बोगस मतांच्या आधारे निवडून आल्याचा आरोप तसेच निवडणूक आयोग संगनमतातून हा सर्व प्रकार झाल्याचा आरोप दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातून जिंकलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध गुडधे,दक्षिण नागपूरमधून जिंकलेले मते यांच्याविरुद्ध पांडव,चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूरमधून जिंकलेले भांगडिया यांच्याविरुद्ध वारजूरकर, बल्लारपूरमधून विजयी झालेले मुनगंटीवार यांच्याविरुद्ध रावत,तर राजुरा येथून जिंकलेले भोंगळे यांच्याविरुद्ध धोटे यांनी निवडणूक याचिका दाखल केली होती.त्यानुसार फडणवीस व इतरांनी या निवडणूक याचिकांना विरोध केला होता. दरम्यान,भाजपाच्या सर्व आमदारांनी नागपूर खंडपीठामध्ये आपले म्हणने मांडले होते. आपल्याविरोधात दाखल केलेल्या याचिका फेटाळण्यात यावा,असा अर्ज त्यांनी केला होता. निवडणूक याचिका लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम ८१ (१) मधील निकष पूर्ण करीत नाही.त्यामुळे या याचिका सुरुवातीच्या टप्प्यातच फेटाळून लावण्यात यावे,अशी विनंती फडणवीस व आमदारांनी न्यायालयाला केली होती.त्यानुसार आज,शुक्रवार ४ जुलै रोजी उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका निकाली काढत खारीज करण्यात आल्याने मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्यासह चार आमदारांना एकप्रकारे दिलासा मिळाला आहे.
- Advertisement -

