- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-जिल्ह्यात आज,मंगळवार १० जून रोजी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.विशेष करून पवनी तालुक्यातील आसगाव परिसरात वादळाने नागरिकांची तारांबळ उडाली होती.वादळी वाऱ्यामुळे भेंडाळा,खैरी,दिवाण, मोखारा,वडेगाव येथे घरांवरील टिनपत्रे आणि छत उडाले.अश्यातच चंद्रमणी विहार समितीने अथक परिश्रम आणि बौद्ध उपासकांच्या सहकार्याने पवनी शहरात ४५ ते ५० फूट उंच भव्य बौद्ध मूर्तीची स्थापना केली होती.मात्र,आज मंगळवारी सायंकाळच्या सुमारास वादळीवाऱ्यामुळे गौतम बुद्धांची भव्य-दिव्य अशी मूर्ती कोसळली.त्यातच वादळीवाऱ्यामुळे मुख्य रस्त्यांवर झाडे कोसळल्याने पवनी-लाखांदूर मार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली.चंद्रपूर जिल्ह्यालाही वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले.चंद्रपूरात आज मंगळवारी सायंकाळी पाऊस झाला.वादळी पावसामुळे अनेक भागांत झाडे उन्मळून पडली.ताडोबा मार्गावरील पदमापूर-मोहरली रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतूक कोंडी झाली होती.त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
- Advertisement -

