मुंबई :-विदर्भातील ब्रम्हपुरी आणि अकोला येथे तापमानाने ४५ अंशांचा उच्चांक गाठला आहे.याच वेळी हवामान विभागाने राज्यात वादळी पावसाचे आणि गारपिटीचे इशारे दिले आहेत.सूर्याच्या आगीत राज्य भाजून निघत असतांना आता वादळी पावसाला पोषक हवामान झाले आहे.सोलापूर,लातूर,धाराशिव, नांदेड जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज असल्याने येलो अलर्ट म्हणजेच दक्षतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.अशातच आता हवामान खात्याने विदर्भात पाच दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.त्यात दोन जिल्ह्यांमध्ये गारपीटीचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे.विदर्भ,मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाला पोषक हवामान आहे.त्यामुळे विदर्भातील काही ठिकाणी पुढील पाच दिवस वादळी पावसाचा अंदाज आहे.मध्य महाराष्ट्रातही काही भागात ढगाळ वातावरणासह हलक्या सरी पडतील,असाही अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.विदर्भातील यवतमाळ,चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे.चंद्रपूर, नागपूर,वर्धा,गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांत पुढील पाच दिवस काही ठिकाणी विजांचा कडकडाटासह वादळ वारा व अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे.
विदर्भ,मराठवाड्यात पावसाला पोषक हवामान.. – चंद्रपूर,गडचिरोलीसह पाच जिल्ह्यांना पाच दिवस अवकाळी झोडपणार…
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक

