- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-पनीर हा खाद्यपदार्थामधील आवडता पदार्थ असून त्याला बाजारात मोठी मागणी असते.विशेषतः लहान मुलांमध्ये पनीरची क्रेझ अधिक आहे.मात्र,काही ठिकाणी बनावट पनीर अथवा ‘चीज ऍनालॉग’ वापरून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या तपासणीत आढळून आले आहे.अशाप्रकारे ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या पनीर विक्रेत्यांवर अन्न सुरक्षा व मानके अधिनियमातील नियमानुसार कारवाई केली जाईल,असे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी म्हटले आहे.अन्न सुरक्षा आणि मानके(लेबलिंग व डिस्प्ले नियमन)२०२० च्या नियमांनुसार,विक्री होणाऱ्या अन्नपदार्थातील सर्व घटक व पोषणमूल्यांची माहिती रेस्टॉरंट,हॉटेल,कॅटरर्स आणि फास्ट फूड विक्रेत्यांना आपल्या मेनू कार्ड्स,डिस्प्ले बोर्ड्स आणि ऑर्डर मशीनवर अचूक माहिती देणे अनिवार्य आहे, त्यातच अन्न व औषध प्रशासन विभाग ग्राहकांच्या हितासाठी कटिबद्ध आहे.अन्नाच्या गुणवत्तेशी कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. रेस्टॉरंट,हॉटेल व फास्ट फूड व्यावसायिकांकडून ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत,असेही झिरवाळ यांनी म्हटले आहे.अन्न व औषध प्रशासन सर्व अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील चीज ॲनालॉग वितरकांचे खरेदी-विक्री बिले तपासण्याचे निर्देश दिले आहेत.तसेच,हॉटेल,रेस्टॉरंट,फास्ट फूड विक्रेते आणि कॅटर्स यांची खरेदी बिले तपासून,पनीरच्या ऐवजी ॲनालॉगचा वापर करून ग्राहकांची फसवणूक केल्यास कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.तसेच उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर नियमन २०११ मधील तरतुदींनुसार तात्काळ परवाना निलंबन करणार असल्याचेही झिरवाळ यांनी स्पष्ट केले आहे.
- Advertisement -

