- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्यात विजेची समस्या व रानटी हत्तींनी उपद्रव माजविला आहे.ऐन उन्हाळ्याच्या दिवसांत जिल्ह्यात विजेचा लपंडाव सुरू असून रानटी हत्तींनी शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांची नासधूस चालवली असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.अशातच समस्यांबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्यापही यावर ठोस उपाययोजना करण्यात शासन व संबंधित विभाग फोल ठरला आहे.त्यामुळे आता जनतेच्या संयमाचा बांध फुटला असून येत्या,मंगळवार २२ एप्रिल रोजी आरमोरी तालुक्याच्या देऊळगाव मुख्य मार्गावरील नॅशनल हायवेवर गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम व गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी गडचिरोली येथे झालेल्या पत्रपरिषदेत दिली.पार पडलेल्या पत्रपरिषदेत आंदोलनाचे नियोजन, मागण्या व पुढील धोरण याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचे गंभीर समस्यांकडे लक्ष वेधण्यात येणार आहे.नागरिकांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन आमदार रामदास मसराम व जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केले आहे.
- Advertisement -

