- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नवी दिल्ली :-आधार कार्ड हे फक्त ओळख प्रस्थापित करणारे युनिक क्रमांक आहे.त्यामुळे आधार कार्डचा
संबंध भारतीय नागरिकत्वाशी नाही.मात्र,सध्या स्थितीत आधार कार्डला बरेच महत्त्व प्राप्त झाले आहे.जिथे-तिथे आधार लिंक करण्यासाठी शासन स्तरावरून सांगितले जात आहे.बँक खाते असो वा पॅन कार्ड यासोबत आधारकार्ड लिंक(संलग्न) करणे गरजेचे झाले आहे. अशातच आता मतदानकार्डलाही आधारकार्ड लिंक करण्यात येणार आहे.सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आणि घटनेतील तरतुदीनुसार निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. आज,मंगळवारी १८ मार्च रोजी दिल्लीत झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला असून लवकरच यासंदर्भात तज्ज्ञांसोबत सल्लामसलत सुरू होणार आहे.भारतीय संविधानातील अनुच्छेद 326 नुसार मतदानाचा अधिकार फक्त भारतीय नागरिकांनाच दिला जाऊ शकतो. आधार कार्डच्या मदतीने एखाद्या व्यक्तीची ओळख समजू शकते. त्यामुळेच मतदान कार्ड आणि आधार क्रमांक लिंक केले जाणार आहेत.ही सर्व प्रक्रिया संविधानातील अनुच्छेद ३२६ नुसार तसेच लोकप्रतिनिधी कायदा १९५० च्या कलम २३(४),२३(५) व २३ (६) आणि सर्वोच्च न्यायालायाने दिलेल्या निर्णयाच्या अधीन राहूनच केली जाईल.लवकरच UIDAI आणि भारतीय निवडणूक आयोगाच्या तांत्रिक तज्ज्ञांसोबत याबाब सल्लामसलत केली जाईल.सध्या अनेक ठिकाणी एकाच मतदाराची नावे वेगवेगळ्या ठिकाणी नोंद होण्याचे प्रकार समोर आले आहेत.तसेच, बोगस मतदार ओळखणे आणि बनावट मतदान रोखण्यासाठी सरकार आणि निवडणूक आयोगाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.आधार कार्ड लिंक मुळे प्रत्येक मतदाराची ओळख निश्चित करता येईल आणि निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणता येईल.या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी निवडणूक आयोग लवकरच तज्ज्ञ आणि कायदेतज्ज्ञांसोबत चर्चा करणार आहे.केंद्र सरकारकडून यासाठी आवश्यक तांत्रिक सुधारणा करण्यात येतील.याबाबत लवकरच मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली जातील.मतदारांना त्यांचे आधार कार्ड लिंक करण्यासाठी एक निश्चित कालावधी दिला जाईल तसेच ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने ही प्रक्रिया पार पडणार आहे.
- Advertisement -

