चंद्रपूर :-जिल्ह्याच्या कोरपना तालुक्यातील सोनुर्ली गावाजवळील एमएस कापूस जिनींग कारखान्यात आज,रविवार २६ जानेवारीला सकाळच्या सुमारास लागलेल्या आगीत सुमारे दोनशे गाठी जळून खाक झाल्या असून लाखोंचे नुकसान झाले आहे.सदरची आग ही शार्टसर्कीटमुळे लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.यात सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झाली नाही.कारखान्यात कापसाच्या बोंड्यापासून कापूस वेगळा करण्याची यांत्रिक प्रक्रिया करून प्रक्रियेत कापसाच्या बोंड्यांमधून जिन्याचा कचरा काढून टाकला जातो आणि बियाण्यापासून कापसाचे तंतू वेगळे केले जातात.या जिनिंग मध्ये सीसीआय व प्रायव्हेट कापूस खरेदी सुरू होती.कापूस खरेदी केल्यानंतर कापसाच्या गाठी तयार करून पाठविल्या जातात.त्यामुळे आज रविवारी सकाळी गाठी तयार करण्याचे काम सुरू होते. दरम्यान,अचानक कापसाच्या गाठींना आग लागली.सदर आग कामगारांच्या लक्षात येताच कामगारांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला.लगेच गडचांदूर नगरपरिषद,अल्ट्राटेक सिमेंट,दालमिया सिमेंटच्या ३ अग्निशामक बोलविण्यात आले. अग्निशामक वाहनाच्या मदतीने आग विझविण्यात आली असून यात सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झाली नाही.
कापूस जिनींग कारखान्यात आग; सुदैवाने जिवीतहानी टळली..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक

