- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कोंढाळा(गडचिरोली):-शिक्षणासोबतच मुलांना व्यावहारीक ज्ञानाची देखिल गरज आहे.दर्जेदार शिक्षणांसोबतच विविध उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी घडविण्याचे काम होत आहे.विद्यार्थ्यांनी भरवलेला हा आनंद मेळावा सर्वांसाठी महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते अरूण कुंभलवार यांनी केले.देसाईगंज तालुक्याच्या विद्या निकेतन लोकमान्य टिळक विद्यालय कोंढाळा येथे नुकताच बाल आनंद मेळावा संपन्न झाला.प्रसंगी आयोजित मेळाव्यात सामाजिक कार्यकर्ते अरूण कुंभलवार बोलत होते.
बाल आनंद मेळावा हा शैक्षणिक जिवणपटलावरील महत्वाचा घटक आहे.विद्यालयीन शिक्षण घेत असतांना व्यवसायाची सांगड घालून ज्ञानार्जन गिरविले पाहिजे. आजचे युग तंत्रज्ञानाचे युग असल्याने शिक्षणासह इतरही पाया मजबूत करणे गरजेचे झाले आहे.त्यामुळे विद्यालयाने आयोजित केलेला बाल आनंद मेळावा कौतुकास्पद आहे.तसेच आनंद मेळाव्यातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण मिळत आहे.विद्यार्थिनींनी व्यवसायाची मांडणी, हिशोब,संवादकौशल्य यासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण ठरला असल्याचेही प्रतिपादन कुंभलवार यांनी केले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जयानंद बुराडे,शाळेचे मुख्याध्यापक केशव देशमुख,पत्रकार
नितेश पाटील,शिक्षक हर्षे,शिक्षिका रीना कन्नाके, स्वाती ढोंगे,हर्षद कांबळी,मनोज तरवटकर,अशोक निंबुरकर,दिलीप पारधी,आशिष बुल्ले सह शिक्षक- पालक उपस्थित होते.
- Advertisement -

