Wednesday, June 10, 2026
Homeनागपूरअजबचा कारनामा..! ठकबाजाने दहा वर्षांपूर्वी पाच कोटीला विकलेला भूखंड परत दुसऱ्याला विकला..

अजबचा कारनामा..! ठकबाजाने दहा वर्षांपूर्वी पाच कोटीला विकलेला भूखंड परत दुसऱ्याला विकला..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-एकच जमीन दोन जणांना विकून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारा ठकबाज गुणवंत तुमसरेचा आणखी एक प्रताप समोर आला आहे.दहा वर्षांपूर्वी विकलेल्या सुमारे पाच कोटी रुपयांचा भूखंड त्याने दुसऱ्याला विकला.बेलतरोडी पोलिसांनी तुमसरेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.फसवणूक,जमीन बळकावणे,पोलिसांवर हल्ला करणे,असे अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,फसवणूक आणि गुन्हेगारीच्या जगात त्याचा प्रभाव असण्यासोबतच त्याचा पेट्रोल पंप आणि बारही आहे.निहाल तिवारी याचे वडील गोविंद तिवारी यांनी २००५ मध्ये तुमसरे याच्याशी बेलतरोडी पोलिस ठाण्यांतर्गत गोटाळ पांजरी येथे ८ हजार चौरस फुटांच्या दोन भूखंडांचा सौदा अंबा गृहनिर्माण संस्थेमार्फत केला होता.९ मे २०१६ रोजी गोविंद तिवारी यांचा गच्चीवरून पडून मृत्यू झाला.वडिलांच्या निधनानंतर निहाल,त्याची आई व कुटुंबीय तुमसरेकडे गेले व त्याला प्लॉट दाखवण्यास सांगितले.तुमसरेने प्लॉट दाखविण्यास नकार दिला व जीवे मारण्याची धमकी दिली.यामुळे तिवारी कुटुंबीय दहशतीत आले.
जानेवारी २०२३ मध्ये निहाल कुटुंबीयांसह प्लॉटवर गेला होता.तिथे त्याला इतर लोकांचे फलक दिसले. याबाबत संपर्क साधला असता,कथित भूखंडधारक त्याच्या साथीदारांसह तेथे आला आणि निहालला धमकावू लागला.निहालने बेलतरोडी पोलिस ठाणे गाठून घटनेची तक्रार दाखल केली.परंतु त्याच्या तक्रारीवर कोणतीही कारवाई झाली नाही.जुलै २०२४ रोजी पोलिस आयुक्त डॉ.रवींद्रकुमार सिंगल यांनी भूमाफियांपासून त्रस्त लोकांसाठी पोलिस आयुक्तालयात तक्रार निवारण शिबिराचे आयोजन केले होते.याप्रकरणी निहालने फिर्याद दिली.पोलिस आयुक्तांच्या सूचनेवरून बेलतरोडी पोलिसांनी तपास सुरू केला.त्याआधारे तुमच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुमसरेला जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते.असे असतांनाही तो भूमाफिया बनून लोकांचे प्लॉट बळकावत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना झटका.. आता नऊ सिलेंडरवर नाही; तर चारच सिलेंडरवर मिळणार अनुदान..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात रविवार ७ जून २०२६ पासून २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.त्यानुसार, बऱ्याचश्या जिल्ह्यांमध्ये गॅस सिलेंडरच्या किंमतींनी...

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी आधार पडताळणी करणे आवश्यक..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक शेतकरी गेल्या काही वर्षापासून नैसर्गिक आपत्ती,अवकाळी पाऊस, उत्पादन खर्चातील वाढ आणि शेतमालाला न मिळणारा योग्य भाव,यामुळे आर्थिक संकटाचा सामना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!