Wednesday, June 10, 2026
Homeकोंढाळाव्यावहारीक ज्ञानासाठी बाल आनंद मेळावा महत्वपुर्ण-सामाजिक कार्यकर्ते अरुण कुंभलवार - विद्या...

व्यावहारीक ज्ञानासाठी बाल आनंद मेळावा महत्वपुर्ण-सामाजिक कार्यकर्ते अरुण कुंभलवार – विद्या निकेतन शाळा कोंढाळा येथे बाल आनंद मेळावा संपन्न..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कोंढाळा(गडचिरोली):-शिक्षणासोबतच मुलांना व्यावहारीक ज्ञानाची देखिल गरज आहे.दर्जेदार शिक्षणांसोबतच विविध उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी घडविण्याचे काम होत आहे.विद्यार्थ्यांनी भरवलेला हा आनंद मेळावा सर्वांसाठी महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते अरूण कुंभलवार यांनी केले.देसाईगंज तालुक्याच्या विद्या निकेतन लोकमान्य टिळक विद्यालय कोंढाळा येथे नुकताच बाल आनंद मेळावा संपन्न झाला.प्रसंगी आयोजित मेळाव्यात सामाजिक कार्यकर्ते अरूण कुंभलवार बोलत होते.
बाल आनंद मेळावा हा शैक्षणिक जिवणपटलावरील महत्वाचा घटक आहे.विद्यालयीन शिक्षण घेत असतांना व्यवसायाची सांगड घालून ज्ञानार्जन गिरविले पाहिजे. आजचे युग तंत्रज्ञानाचे युग असल्याने शिक्षणासह इतरही पाया मजबूत करणे गरजेचे झाले आहे.त्यामुळे विद्यालयाने आयोजित केलेला बाल आनंद मेळावा कौतुकास्पद आहे.तसेच आनंद मेळाव्यातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण मिळत आहे.विद्यार्थिनींनी व्यवसायाची मांडणी, हिशोब,संवादकौशल्य यासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण ठरला असल्याचेही प्रतिपादन कुंभलवार यांनी केले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जयानंद बुराडे,शाळेचे मुख्याध्यापक केशव देशमुख,पत्रकार
नितेश पाटील,शिक्षक हर्षे,शिक्षिका रीना कन्नाके, स्वाती ढोंगे,हर्षद कांबळी,मनोज तरवटकर,अशोक निंबुरकर,दिलीप पारधी,आशिष बुल्ले सह शिक्षक- पालक उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना झटका.. आता नऊ सिलेंडरवर नाही; तर चारच सिलेंडरवर मिळणार अनुदान..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात रविवार ७ जून २०२६ पासून २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.त्यानुसार, बऱ्याचश्या जिल्ह्यांमध्ये गॅस सिलेंडरच्या किंमतींनी...

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी आधार पडताळणी करणे आवश्यक..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक शेतकरी गेल्या काही वर्षापासून नैसर्गिक आपत्ती,अवकाळी पाऊस, उत्पादन खर्चातील वाढ आणि शेतमालाला न मिळणारा योग्य भाव,यामुळे आर्थिक संकटाचा सामना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!