Saturday, April 18, 2026
Homeनागपूरबर्ड फ्लू विषाणूने घेतला तीन वाघ आणि एका बिबट्याचा बळी; देशातील पहिलीच...

बर्ड फ्लू विषाणूने घेतला तीन वाघ आणि एका बिबट्याचा बळी; देशातील पहिलीच घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-नागपुरात बर्ड फ्लूमुळे तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू झाल्याने खळबळ माजली असून व्याघ्र प्रकल्प आणि बचाव केंद्रांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.बर्ड फ्लूमुळे वाघाचा मृत्यू होण्याची ही देशातील पहिलीच घटना असल्याची माहिती गोरेवाडा रेस्क्यू सेंटरचे संचालक शतानिक भागवत यांनी दिली.वाघ आणि बिबट्यामध्ये उलट्या, डोळ्यात पाणी येणे,छातीत इन्फेक्शन आणि ताप अशी लक्षणे दिसून आल्याचे सांगितले.
महाराष्ट्रातील नागपूर येथील गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू एच-५एन-१ विषाणूमुळे झाल्याचा अहवाल भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा प्राणी रोग संस्थानने दिला आहे.डिसेंबरमध्ये वाघ आणि बिबट्याचा मृत्यू झाल्यानंतर व्हिसेराचे नमुने भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा प्राणी रोग संस्थानकडे पाठवले होते.प्रयोगशाळेतील नमुन्यांच्या चाचणीचा अहवाल १ जानेवारी २०२५ रोजी समोर आला होता.या नंतर रेस्क्यू सेंटरमधील २६ बिबट्या आणि १२ वाघांची तपासणी केली असता ते निरोगी आढळले.तीनही वाघ तीन ते चार वर्षाचे होते. तर बिबट्या ७ ते ८ महिन्यांचा होता.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

सावधान..! प्रधानमंत्री लोन योजनेच्या नावाने बनावट जाहिरातीचा आधार..

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली फसवणूक करणाऱ्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.कोणत्याही मोठ्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खातरजमा करणे अत्यंत...

मोहफुले वेचत असतांनाच बिबट्याचा हल्ला.. – जंगलशिवारात छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीटातील एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर.. – ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता  गडचिरोली जिल्हा प्रशासन व महिला व बालविकास विभाग ॲक्शन मोडवर आले आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!