- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा(गडचिरोली):-मागील काही वर्षांमध्ये बि- बियाने,रासायनिक खते,औषधे तसेच मजूरीचे दर वाढल्याने धानाचा उत्पादन खर्च वाढलेला दिसून येतो आहे.मात्र,त्या तुलनेत धानाची भाववाढ झालेली नाही; त्यामुळे धान शेती परवडत नाही व शेतकऱ्यांना शासकीय मदतीवर अवलंबून राहावे लागते.धानाला उत्पादन खर्चाच्या अनुरूप योग्य भाव मिळाल्यास शेतकरी स्वतः सक्षम बनून परावलंबी राहणार नाही. असे प्रतिपादन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार रामदास मसराम यांनी केले.कुरखेडा तालुक्याच्या खेडेगांव येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था शासकीय हमीभाव धान खरेदी केंद्राचे उदघाटन आमदार मसराम यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून देसाईगंज पंचायत समितीचे माजी सभापती परसराम टिकले,कांग्रेस जिल्हा उपाध्यक्ष जयंत पाटिल हरडे,कुरखेडा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जिवन पाटील नाट,माजी जि.प.सदस्य प्रभाकर तूलावी,आविका संस्थेचे सभापती राजीराम पूराम,उपसभापति देविदास बंसोड,संचालक लोकचंद दरवडे,शंकर पाटनकर,शिवचरण मडावी,नामदेव दर्रो,टून्नू दर्रो,केवळराम जमदाळ,अंताराम कूमोटी, शशीकला जमदाळ,तूळजाबाई गोटा संस्थेचे व्यवस्थापक देवराव खंडारकर,तूकाराम डोंगरवार, विश्वनाथ मेश्राम,मधूकर डोगंरवार,उपसरपंच भूमेश्वर सोनवाने पोलीस पाटील परसराम नाट,टेमनशहा सयाम,दिलीप दर्रो,नरेश मडावी,होमराज कवडो तसेच मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.
यावेळी पुढे मार्गदर्शन करतांना आमदार मसराम यांनी सांगीतले की,शासकीय धान खरेदी केंद्र सूरू होण्यापूर्वी दरवर्षी विलंब होत असल्याने गरजू शेतकरी खाजगी व्यापाऱ्यांना धान विकतो.येथे हमीभावापेक्षा दर कमी राहत असल्याने त्यांचे नूकसान होते.त्यामुळे यापुढे वेळेवर शासकीय धान खरेदी केंद्र सूरू व्हावे म्हणून शाशनाकडे योग्य तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.सदर कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन ग्यानचंद सहारे यांनी केले.
- Advertisement -

