Wednesday, July 15, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआज पहाटे झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीत ७ नक्षलवाद्यांचा खात्मा...

आज पहाटे झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीत ७ नक्षलवाद्यांचा खात्मा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-आज पहाटे झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीत ७ नक्षलवाद्यांचा खात्मा झाल्याची घटना छत्तीसगड-तेलंगणा सीमा भागात घडली.तेलंगणातील मुलुगु जिल्ह्यातील एतुरागरामच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली.या चकमकीत पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देत सात नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे.
आज,रविवारी १ डिसेंबरच्या पहाटे ५:३० वाजेच्या सुमारास पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली.या चकमकीत पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देत सात नक्षलवाद्यांचा खात्मा केला.तसेच, चकमकीनंतर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे.चालपाका जंगल परिसरात ही चकमक झाली. या चकमकीत मारल्या गेलेल्यांमध्ये नक्षलवाद्यांच्या काही प्रमुख नेत्यांचाही समावेश असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.सुरक्षा दल इथुरुनाग्राममधील चालपाकाजवळील जंगल परिसरात शोध मोहीम राबवत होते.यावेळी नक्षलवाद्यांनी पोलिसांना लक्ष्य करत गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात
सात नक्षलवादी ठार झाले.पोलिसांचे पथक अजूनही
परिसरात नक्षलवाद्यांचा शोध घेत आहेत.दरम्यान,या चकमकीत ठार झालेल्या काही नक्षलवाद्यांची ओळख
पटली आहे.यामध्ये कुरसम मंगू,एगोलाप्पू मल्लैया,
मुसाकी देवल,मुसाकी जमुना,जय सिंह,किशोर आणि कामेश यांचा समावेश आहे.पोलिसांनी त्यांच्या
ताब्यातून अनेक आधुनिक शस्त्रे जप्त केली आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्याच्या विविध भागात पाऊस करणार दमदार एंट्री..

उद्रेक न्युज वृत्त :- 'नैसर्गिक आपत्तीस मंडळ जबाबदार राहणार नाही' अश्या म्हणण्याप्रमाणे पावसाचे काही खरे नाही.कुठे मुसळधार पडतो तर कुठे पाण्याचा एक थेंबही पडत नाही.त्यातच...

आता राज्यभरातील धनादेश अनादराची प्रकरणे परस्पर सामंजस्याने निघणार निकाली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये निगोशिएबल इन्स्ट्रुमेन्ट्स ॲक्ट,१८८१ च्या...

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!