Friday, September 4, 2026
Homeदेसाईगंजआमची सीट निघाली भाऊ...! आरमोरी विधानसभा क्षेत्रात जनतेचा कौल कुणाला? - उद्याला...

आमची सीट निघाली भाऊ…! आरमोरी विधानसभा क्षेत्रात जनतेचा कौल कुणाला? – उद्याला कळणार धनशक्ती v/s जनशक्तीची ताकद..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
संपादक/सत्यवान रामटेके 
देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीचे मतदान दोन दिवसांपूर्वी म्हणजेच २० नोव्हेंबरला पार पडले.मतदानापूर्वी ‘आजची रात्र ही वैऱ्याची रात्र’ म्हणीत सर्वत्र मोठ्या प्रमाणावर धनशक्तीचा बोलबाला दिसून आला.धनशक्तीचा बोलबाला जरी झाला असला तरीही धनशक्ती पेक्षा जनशक्ती ही सर्वात शक्तिशाली मानली जाते.गडचिरोली जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदासंघात यावेळी सर्वांचे पारडे जड असल्याचे बोलले जात आहे.अशातच उद्या,शनिवार दिनांक-२३ नोव्हेंबरला जिल्ह्यातील २९ उमेदवारांचे बंद मतपेट्यातील भवितव्य कळणार असून ‘आमची सीट निघाली गां भाऊ…!’ म्हणीत जल्लोष साजरा केला जाणार आहे.
आरमोरी विधानसभा मदारसंघाचा एकंदरीत मागील निवडणूक व यावेळी पार पडलेल्या निवडणुकीचा विचार केला तर यावेळी जनता,कर्मचारी वृंद,विविध पक्षातील नेते,पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्या वतीने नव्या उमेदवारांना मिळालेली पसंती ही गेम चेंजर म्हणून ठरू शकते. त्यामुळे यावेळी ‘धनशक्ती v/s जनशक्तीची ताकद’ अनेकांना काही फरकाने तरी पहावयास मिळणार आहे.
आरमोरी विधानसभा मतदार संघात यावेळी ८ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले होते.यामध्ये रामदास मळूजी मसराम-इंडियन नॅशनल काँग्रेस,कृष्णा दामाजी गजबे-भारतीय जनता पार्टी,आनंदराव गंगाराम गेडाम-अपक्ष,शिलू प्रविण गंटावार-अपक्ष,मोहनदास गणपत पुराम-वंचित बहुजन आघाडी,चेतन नेवशा काटेंगे-आझाद समाज पार्टी (कांशीराम),अनिल तुलाराम केरामी-बहुजन समाज पार्टी,खेमराज वातूजी नेवारे-अपक्ष इत्यादींनी विधानसभा निवडणुकीत उडी मारत नशीब आजमावू पाहिले.अशातच ८ उमेदवारांनी जरी आमदारकीसाठी नशीब आजमावू पाहिले असले,तरीही यावेळेस केवळ दोनच उमेदवारांमध्ये चुरशीची लढत पहावयास मिळाली आहे.यामध्ये भाजपा v/s काँग्रेस.त्यामुळे सर्वत्र जास्तीत जास्त धनशक्तीचा मारा पहावयास मिळाला.काहींनी धनशक्ती ही माझीच आहे; असे म्हणीत जनशक्तीकडे वळती न करता आपलेच घर भरल्याची चर्चा रंगू लागली आहे.त्यामुळे पुढील जिल्हा परिषद,नगरपरिषद,पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकीत यांना त्यांची जागा दाखवून देऊ; अशीही चर्चा दबक्या आवाजात सर्वत्र सुरू आहे.झाले-गेले पार पडले जरी असले तरीही उद्याला कळणार की, ‘आमची सीट निघाली भाऊ…!’ अशातच केवळ नेते,पदाधिकारीच यांचा सत्कार करून चालणार नाही,तर यात जनतेचा सिंहाचा वाटा असल्याने त्यांना विसरून चालणार नाही.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!