- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर रेशन दुकानदारांनी १ नोव्हेंबरपासून पुकारलेला बंद तुर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देवल यांनी नवीन सरकार आल्यावर तुमचे प्रश्न मांडा असे आवाहन केल्याने संघटनेने एक पाऊल मागे घेतले. त्यामुळे गोरगरीब जनतेची दिवाळी सुखमय होणार आहे.
केंद्र सरकारने क्विंटलमागे २० रुपये मार्जिन वाढवून द्यावे; या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांवरुन राज्यातील रेशन दुकानदारांनी आक्रमक भूमिका घेतली.आल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकिपर्स फेडरेशनच्या नेतृत्वात लक्ष्मीपूजनापासून संपावर जाण्याची घोषणा केली होती.रेशन दुकानदारांनी पुकारलेल्या संपाची प्रधान सचिव देवल यांनी तातडीने दखल घेत चर्चेसाठी पाचारण केले.निवडणूकांची आचारसंहिता लागू असल्याने संपावर जाता येणार नाही.तसेच नवीन सरकार स्थापन झाल्यावर तुमचे कमिशन वाढवून घ्यावे.तसेच अन्य मागण्यांबाबतही प्रयत्न करु असे आवाहन देवल यांनी केले. संघटनेने देवल यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत संप तुर्तास स्थगित केला आहे. बैठकीसाठी संघटनेचे राज्यध्यक्ष गणपत डोळसे-पाटील, डी.एन.पाटील,निवृत्ती कापसे, शांताराम पाटील,विवेक भेरे,बाबुराव ममाने आदी उपस्थित होते.
- Advertisement -

