Monday, July 27, 2026
Homeकोंढाळाकोंढाळा येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने मतदार जनजागृती अभियान...

कोंढाळा येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने मतदार जनजागृती अभियान…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंज शहरातील मोहसीनभाई जव्हेरी महाविद्यालयातर्फे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने विशेष मतदार जनजागृती अभियान देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथे राबवण्यात आला.मतदार जनजागृती अभियानास ग्रामपंचायतीच्या सरपंचा अर्पणा राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली गावकऱ्यांना मतदानाचे महत्व सांगून जनजागृती करण्यात आली.तसेच रासेयो स्वयंसेवकांनी घरोघरी जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधला आणि मतदानाच्या महत्वाबाबत जनजागृती केली.लोकांना मतदान प्रक्रियेची माहिती देत मतदान हक्काचा योग्य वापर करण्याचे आवाहान करण्यात आले.मतदान हे लोकशाहीचे महत्वाचे अंग आहे आणि प्रत्येक नागरिकाने त्याचा योग्य वापर केला पाहीजे; असे स्वयंसेवकांनी स्पष्ट केले.प्रसंगी मतदान प्रक्रियेचे वर्णन करीत मतदान हे केवळ हक्क नाही तर आपले आद्य कर्तव्य आहे.मतदान हे प्रत्येक देशाच्या विकासात महत्वाचे योगदान देते.उपस्थित ग्रामस्थांनी उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देत आगामी निवडणुकीत मतदान करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाच्या निमित्याने महाविद्यालयाच्या परिसरात रासेयो स्वयंसेवकांनी एकत्र येऊन मतदानाची शपथ घेतली.स्वयसेवकांली “मी प्रामाणिकपणे आणि निष्पक्षपणे माझा मतदान हक्क वाजावीन” अशी शपथ घेतली.प्रसंगी संस्थाध्यक्ष जैनुद्दीन जव्हेरी यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृती कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.सदर कार्यक्रमाचे आयोजक रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.आशिष सेलोकर यांच्या नेतृत्वाखाली करण्याव आले.त्यांनी मतदार जागरूकतेचे महत्व विषद केले आणि विद्यार्थ्यांना समाजसेवेसाठी प्रात्साहित केले.मतदार जागरूकता अभियान हे विद्यार्थ्यांसाठी एक सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण करणारे पाऊल ठरले असल्याचे मत व्यक्त केले.अभियानास महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीत १७ प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्याधारित प्रशिक्षण हे केवळ रोजगार मिळविण्याचे साधन नसून युवकांना स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि उद्योगक्षम बनविण्याचे प्रभावी माध्यम आहे.उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार प्रशिक्षण घेतल्यास...

वाघोबाची दहशत; तब्बल दहा गावात ‘हाय अलर्ट’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या सेलू,वर्धा व इतर तालुक्यातील परिसरात तीन वर्षे वयोगटातील तरुण नर वाघोबाची भ्रमंती सुरू असल्याने तब्बल दहा गावात वन विभागाच्या वतीने...

पुढील दोन दिवस पावसाचे; तर आज सात जिल्ह्यात वादळी पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पूर्वी उन्हाळा,पावसाळा व हिवाळा ठरलेल्या मोसमातील महिन्यांतच 'मी आलोय' म्हणायचा.मात्र, गेल्या काही कालावधीपासून नैसर्गिक चक्राच्या बदलांमुळे ऐन पावसाळ्यात पाऊस कधी पडणार...

तरुणाईचा धसका..! पेपरफुटीवर कठोरता आणण्यासाठी आज सादर होणार परीक्षा सुधारणा विधेयक..

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या दिल्लीत संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून देशभरातील विद्यार्थ्यांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासोबतच राष्ट्रीय परीक्षा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!