Monday, July 27, 2026
Homeगोंदियासाखरपुड्याचा कार्यक्रम आटोपला; लग्नात क्रेटा गाडी किंवा १५ लाख रुपये द्या म्हणून...

साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपला; लग्नात क्रेटा गाडी किंवा १५ लाख रुपये द्या म्हणून लग्न मोडला.. – ६ जणांवर हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपल्यावर हुंड्याच्या स्वरूपात क्रेटा गाडी किंवा १५ लाख रुपये द्या,अशी मागणी करीत उपवराकडील मंडळींनी लग्न मोडले.यासंदर्भात काल,शनिवारी २२ फेब्रुवारीला ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ग्राम चांदणीटोला येथील २६ वर्षीय मुलीसोबत भंडारा जिल्ह्यातील साईमंदिर रोड विनोबा नगर तुमसर येथील मुलगा नितीन बाबुलाल उपराडे वय ३४ वर्षे याचे लग्न जुळले होते.रीतिरिवाजाप्रमाणे ३१ जानेवारी रोजी साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपला. लग्नात क्रेटा गाडी किंवा १५ लाख रुपये द्या,अशी मागणी मुलाकडील मंडळीकडून करण्यात आली. मुलीकडील मंडळींनी हुंडा देण्यास नकार देताच मुलाकडून ते लग्न मोडले.या घटनेसंदर्भात काल २२ फेब्रुवारी रोजी आरोपी मुलगा नितीन उपराडे,त्याची आई सुशीला बाबुलाल उपराडे वय ५५ वर्षे,बहीण प्रेरणा अरुण तिवडे वय ३० वर्षे, रा.साईमंदिर रोड विनोबा नगर,तुमसर,मुलाचा मामा भागचंद गराडे वय ५० वर्षे,रा.कारंजा, ता.जि.गोंदिया, पुरुषोत्तम दमाहे वय ५५ वर्षे,रा.गणेश लॉनचे मागे, तुमसर,सेवक चिखलोंडे वय ५४ वर्षे,रा.जब्बारटोला, ता.जि.गोंदिया या सहा जणांवर हुंडा प्रतिबंधक कायदा कलम ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास हवालदार देवाजी बहेकार करीत आहेत.२२ जानेवारी रोजी सेवक चिखलोंडे याच्या मार्फतीने लग्न जुळले होते. आरोपी नितीन बाबुराव उपराडे हा बंगळुरू येथे सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..! तब्बल १९९ किलो गाजांची वाहतूक; दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १९९.५६० किलो ग्रॅम वजनाच्या गाजांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या....

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीत १७ प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्याधारित प्रशिक्षण हे केवळ रोजगार मिळविण्याचे साधन नसून युवकांना स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि उद्योगक्षम बनविण्याचे प्रभावी माध्यम आहे.उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार प्रशिक्षण घेतल्यास...

वाघोबाची दहशत; तब्बल दहा गावात ‘हाय अलर्ट’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या सेलू,वर्धा व इतर तालुक्यातील परिसरात तीन वर्षे वयोगटातील तरुण नर वाघोबाची भ्रमंती सुरू असल्याने तब्बल दहा गावात वन विभागाच्या वतीने...

पुढील दोन दिवस पावसाचे; तर आज सात जिल्ह्यात वादळी पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पूर्वी उन्हाळा,पावसाळा व हिवाळा ठरलेल्या मोसमातील महिन्यांतच 'मी आलोय' म्हणायचा.मात्र, गेल्या काही कालावधीपासून नैसर्गिक चक्राच्या बदलांमुळे ऐन पावसाळ्यात पाऊस कधी पडणार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!