Sunday, August 9, 2026
Homeमुंबईसर्वच शाळांना पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा विषय अनिवार्य….-शालेय शिक्षण व मराठी...

सर्वच शाळांना पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा विषय अनिवार्य….-शालेय शिक्षण व मराठी भाषा विकास मंत्री दीपक केसरकर

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुंबई :-राज्यातील सर्व मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषा हा अनिवार्य विषय आहे.मागील वर्षात काही मंडळाच्या शाळांना थोडीशी सवलत देण्यात आली होती; परंतु आता सर्वच शाळांना पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा विषय अनिवार्य असल्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा विकास मंत्री दीपक केसरकर यांनी आज रविवारी नवी मुंबईत सांगितले.नवी मुंबईतील वाशी येथे सुरू असलेल्या विश्व मराठी संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी केसरकर यांनी हे प्रतिपादन केले.केसरकर पुढे म्हणाले,मराठी भाषेची सर्व मंडळे एकत्र आणण्यासाठी आपल्या राज्यातही लवकरच ‘मराठी भाषा भवना’ची निर्मिती होणार आहे.यासाठी शासनाने २६० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे.

मराठी भाषा भवनाच्या निर्मितीनंतर मराठी भाषा संवर्धनाशी संबंधित असलेली सर्व कार्यालये,मंडळे ही एकाच इमारतीत येणार आहेत. त्यामुळे मराठी भाषा संवर्धनाच्या कामकाजात अधिक सुसूत्रता व गती येईल.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखलेल्या नव्या शैक्षणिक धोरणाचा आवर्जून उल्लेख करीत केसरकर म्हणाले, मातृभाषेतून शिक्षण ही बाब काळाची गरज आहे. महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे की, ज्याने इंजिनिअरिंगचे शिक्षणही मातृभाषा मराठीतून शिकविण्याचे धोरण स्वीकारले. प्रत्येक जिल्ह्याला मराठी भाषेचे काम करण्यासाठी निधीची तरतूद करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर विविध उपक्रम, कार्यक्रमांमधून मराठी भाषा संवर्धनाचे काम जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न मराठी भाषा विभागाकडून होत असल्याचेही त्यांनी सांगितले.पुढील वर्षी विश्व मराठी संमेलन घेण्यासाठी आम्हाला लवकर निधी मिळाला, तर त्याचे नियोजन यापेक्षाही अधिक चांगले करू आणि हे संमेलन वैश्विक स्तरावर आपला एक वेगळा ठसा उमटवेल, असा आमचा प्रयत्न राहील, असेही केसरकर म्हणाले. या वेळी आम्हाला खूप कमी वेळ मिळाला; तरीही आम्ही हे नियोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रेल्वेची जोरदार धडक; बिबट्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा वनपरिक्षेत्राच्या मूर्ती वनक्षेत्रातून गेलेल्या दक्षिण मध्य रेल्वेच्या बल्लारशाह-काजीपेठ रेल्वे मार्गावरील कक्ष क्रमांक-५९० मधील पोल क्रमांक १५२/२६ नजिक एका नर बिबट्याचा रेल्वेच्या...

ऑनलाईन केवायसीच्या नावाखाली डॉक्टरची साडेसात लाखांची फसवणूक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका अज्ञात सायबर चोरट्याने ऑनलाईन केवायसीच्या नावाखाली डॉक्टरची तब्बल साडेसात लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला. डॉ.राघवेंद्र...

एकेकाळी ज्या भागात फडकायचे लाल,काळे झेंडे; आता पहिल्यांदाच फडकणार तिरंगा..

उद्रेक न्युज वृत्त :-देशातील नक्षलवादाची संपूर्ण मुळे ३१ मार्च २०२६ पर्यंत उपटून फेकण्यात येणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर करताच राज्याच्या विविध जिल्ह्यातील...

महागाईची झळ; दुग्धजन्य पदार्थांच्या किंमतीसह दूध विक्रीत होणार वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-अगोदरच महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असतांनाच आता त्यात आणखी भर पडून दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिकांनी दूध विक्रीच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!