- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या
शिवराजपूर येथील ज्ञानज्योती युवा मंडळाच्या वतीने आज,रविवार २८ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.विशेष म्हणजे, शिवरजपुरसह ऊसेगाव,फरी व इतर गावातील ग्रामस्थांना तसेच वाहनधारकांना वळण मार्गावरील कचरा व झाडांमुळे समोरील व्यक्ती दिसत नसल्याने एखादेवेळी अपघात होऊन अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याने वळण मार्ग तसेच परिसरातील साफसफाई करण्यात आली.

शिवराजपूरच्या वळण मार्गावर मोठ्या प्रमाणात कचरा व झाडे असल्यामुळे मार्गावरून आवागमन करणाऱ्या वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. कचऱ्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघाताचा धोका वाढला होता.या गंभीर समस्येवर उपाय म्हणून शिवराजपूर येथील ज्ञानज्योती युवा मंडळातील सर्व तरुणांनी एकत्र येऊन कचरा साफसफाई मोहिम राबवली.मोहिमेत कचरा व झाडे तोडून मार्ग स्वच्छ करण्यात आला.यामुळे आता वाहनधारकांसह नागरिकांना आवागमन करण्यास सुलभता निर्माण झाली असून अपघाताचा धोका टळला आहे.ज्ञानज्योती युवा मंडळाच्या वतीने परिसरात राबविलेल्या स्वच्छता मोहीम उपक्रमाचे स्थानिक नागरिकांनी कौतुक केले आहे.
- Advertisement -

