Friday, July 17, 2026
Homeमुंबईशासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-राज्यातील लाखो शासकीय कर्मचारी तसेच पेंशनधारकांसाठी आनंदाची बातमी असून राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी आज,बुधवार २५ फेब्रुवारी रोजी विधान परिषदेत मोठी घोषणा करून शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.यानुसार,आता राज्याचा महागाई भत्ता ५५ टक्क्यांवरून वाढून ५८ टक्के झाला आहे.शासनाच्या या निर्णयानुसार,महागाई भत्त्यातील ही वाढ १ जुलै २०२५ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात येणार आहे.कर्मचाऱ्यांना जुलै २०२५ ते ऑक्टोंबर २०२५ या चार महिन्यांच्या कालावधीतील थकबाकीची रक्कम मार्च २०२६ च्या वेतनासोबत अदा केली जाईल.तसेच,नोव्हेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या दरम्यानच्या कालावधीतील थकबाकीबाबत शासन लवकरच स्वतंत्र आदेश निर्गमित करणार आहे.या नियोजित निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक वर्षाच्या अखेरीस मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे.या निर्णयाचा थेट लाभ राज्यातील सुमारे ५ लाख ९६ हजार कार्यरत शासकीय कर्मचाऱ्यांना आणि ८ लाख १२ हजार निवृत्तीवेतनधारकांना(पेंशनधारक)मिळणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री; एसटीच्या तिकीट दरात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्य परिवहन प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटी बसेसच्या भाडेवाढीच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. आखाती देशांतील युद्धामुळे इंधनाच्या किंमतीत...

आता राज्यातील रुग्णालयांत इच्छामरणासाठी विशेष वैद्यकीय समित्या होणार स्थापन; शासन निर्णय जारी..

उद्रेक न्युज वृत्त :-जेव्हा एखादी व्यक्ती अत्यंत गंभीर व्याधीने ग्रस्त आणि दीर्घकाळ बेशुद्धावस्थेत राहते, तेव्हा अशी व्यक्ती स्वतः निर्णय घेऊ शकत नाही.अशा वेळी मरण...

महामार्गाच्या मध्यभागी आलेले पाणीपुरवठा योजनेचे चेंबर धोकादायक; संबंधित विभागाचे दुर्लक्ष.. – रविंद्र गोटेफोडे यांची तातडीने स्थलांतराची मागणी

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा शहरातून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५४३ च्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे चेंबर थेट रस्त्याच्या मध्यभागी आल्याने गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला...

सर्पदंश झाल्यास काय करावे आणि काय करू नये,घ्या जाणून.. – गडचिरोली जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत एकूण १३४ सर्पदंशाच्या घटनांची नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पावसाळ्याच्या दिवसांत शेतीची कामे वाढल्यामुळे आणि बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे सापांचा मानवी वस्तीत व शेतात वावर वाढतो.गडचिरोली जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र व जंगलाचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!