- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-राज्यातील लाखो शासकीय कर्मचारी तसेच पेंशनधारकांसाठी आनंदाची बातमी असून राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी आज,बुधवार २५ फेब्रुवारी रोजी विधान परिषदेत मोठी घोषणा करून शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.यानुसार,आता राज्याचा महागाई भत्ता ५५ टक्क्यांवरून वाढून ५८ टक्के झाला आहे.शासनाच्या या निर्णयानुसार,महागाई भत्त्यातील ही वाढ १ जुलै २०२५ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात येणार आहे.कर्मचाऱ्यांना जुलै २०२५ ते ऑक्टोंबर २०२५ या चार महिन्यांच्या कालावधीतील थकबाकीची रक्कम मार्च २०२६ च्या वेतनासोबत अदा केली जाईल.तसेच,नोव्हेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या दरम्यानच्या कालावधीतील थकबाकीबाबत शासन लवकरच स्वतंत्र आदेश निर्गमित करणार आहे.या नियोजित निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक वर्षाच्या अखेरीस मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे.या निर्णयाचा थेट लाभ राज्यातील सुमारे ५ लाख ९६ हजार कार्यरत शासकीय कर्मचाऱ्यांना आणि ८ लाख १२ हजार निवृत्तीवेतनधारकांना(पेंशनधारक)मिळणार आहे.
- Advertisement -

