- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-राज्य सरकारने जाहीर केलेल्या ‘एक राज्य एक गणवेश’ योजनेचा फज्जा उडाल्याचे लाजीरवाणे चित्र देशाच्या स्वातंत्र्यदिनीच समोर आले.काही अपवाद वगळता राज्यातील लाखो शालेय विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश मिळाले नाहीत.गणवेश वाटपाची दिलेली दुसरी मुदत पाळण्यात सरकारला अपयश आले आहे.त्यामुळे गणवेशाविनाच मुले स्वातंत्र्यदिनाच्या प्रभात फेऱ्यांमध्ये सहभागी झाल्याचे चित्र पहायला मिळाले.
राज्यातील महायुती सरकारने मोठा गाजावाजा करत गेल्यावर्षी महाराष्ट्रात ‘एक राज्य, एक गणवेश’ ही योजना सुरू केली.राज्यातील प्रत्येक सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांचा गणवेश एका रंगाचा आणि एकसमान असावा,या उद्देशाने सरकारने ही योजना आणल्याचे सांगितले होते.परंतु,शाळा सुरू होऊन आता अडीच महिने उलटले तरी सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना सरकारचा गणवेश मिळालेला नाही.१५ जून रोजी राज्यातील सर्व शाळा सुरू झाल्या.शाळा सुरू होतानाच सरकारने निश्चित केलेला गणवेश विद्यार्थ्यांना मिळणे अपेक्षित होते.
काही ठिकाणी शाळांना १०० रुपयांत गणवेश शिवून देणारे बचत गट निश्चित करता आलेले नाहीत; अशी माहिती मिळते.त्यासाठी शोधाशोध सुरू आहे.तर काही ठिकाणी जिल्ह्यातील एकाच बचत गटाला सर्व शाळांचे गणवेश शिवण्याचे काम दिल्याने काम रखडल्याचे समोर आले आहे.सरकारी व्यवस्थेकडून मात्र याबाबत काहीही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
- Advertisement -

