उद्रेक न्युज वृत्त :-राज्यात उन्हाचा तडाखा कमी-जास्त जरी असला तरीही,काही भागात उष्णतेची लाट उसळू लागली आहे.उन्हात गेल्यानंतर जीव कासावीस होऊन शरीरातून घामाच्या धारा वाहू लागतात. अशातच भारतीय हवामान विभागाकडून (IMD) वेळोवेळी उष्णतेच्या लाटे बाबत माहिती देण्यात येत असतांनाच काल,बुधवारी २६ मार्चला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सोयगाव तालुक्यातील निमखेडी बसथांब्याजवळ विसाव्यासाठी थांबलेल्या अमोल दामोदर बावस्कर वय २५ वर्षे या तरुणाचा उष्माघाताने अचानक मृत्यू झाला असून उष्माघाताचा हा राज्यातील पहिला बळी ठरला आहे. दरम्यान, उष्माघाताचा धोका वाढत चालल्याने राज्याचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.उन्हात बाहेर पडतांना नागरिकांनी दक्षता घ्यावी,उन्हात विशेषतः दुपारी १२ ते ३ या काळात बाहेर जाणे टाळावे,असे आवाहन करण्यात आले आहे.उद्या,शुक्रवार २८ मार्चला पासून तापमान थेट ३ अंशांनी वाढणार असून, पुढील दोन दिवस शुक्रवारी आणि शनिवारी पारा थेट चाळीशीच्या घरात जाईल. आठवडाभरातील हे सर्वाधिक कमाल तापमान असेल.रविवारी पारा ३५ अंश सेल्सिअस येईल. आठवड्यात तापमानात होणारी वाढ पाहता मार्च महिन्याचा शेवट कडक उन्हाच्या तडाख्याने होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविला असून नागरिकांनी अकारण उन्हा-तान्हात फिरू नये व आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
विसाव्यासाठी बसथांब्याजवळ थांबलेल्या तरुणाचा उष्माघाताने मृत्यू; राज्यातील पहिला बळी..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

