Monday, July 20, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तविसाव्यासाठी बसथांब्याजवळ थांबलेल्या तरुणाचा उष्माघाताने मृत्यू; राज्यातील पहिला बळी..

विसाव्यासाठी बसथांब्याजवळ थांबलेल्या तरुणाचा उष्माघाताने मृत्यू; राज्यातील पहिला बळी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यात उन्हाचा तडाखा कमी-जास्त जरी असला तरीही,काही भागात उष्णतेची लाट उसळू लागली आहे.उन्हात गेल्यानंतर जीव कासावीस होऊन शरीरातून घामाच्या धारा वाहू लागतात. अशातच भारतीय हवामान विभागाकडून (IMD) वेळोवेळी उष्णतेच्या लाटे बाबत माहिती देण्यात येत असतांनाच काल,बुधवारी २६ मार्चला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सोयगाव तालुक्यातील निमखेडी बसथांब्याजवळ विसाव्यासाठी थांबलेल्या अमोल दामोदर बावस्कर वय २५ वर्षे या तरुणाचा उष्माघाताने अचानक मृत्यू झाला असून उष्माघाताचा हा राज्यातील पहिला बळी ठरला आहे. दरम्यान, उष्माघाताचा धोका वाढत चालल्याने राज्याचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.उन्हात बाहेर पडतांना नागरिकांनी दक्षता घ्यावी,उन्हात विशेषतः दुपारी १२ ते ३ या काळात बाहेर जाणे टाळावे,असे आवाहन करण्यात आले आहे.उद्या,शुक्रवार २८ मार्चला पासून तापमान थेट ३ अंशांनी वाढणार असून, पुढील दोन दिवस शुक्रवारी आणि शनिवारी पारा थेट चाळीशीच्या घरात जाईल. आठवडाभरातील हे सर्वाधिक कमाल तापमान असेल.रविवारी पारा ३५ अंश सेल्सिअस येईल. आठवड्यात तापमानात होणारी वाढ पाहता मार्च महिन्याचा शेवट कडक उन्हाच्या तडाख्याने होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविला असून नागरिकांनी अकारण उन्हा-तान्हात फिरू नये व आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मन सुन्न करणारी घटना..! जन्मदातीने दहा महिन्यांच्या चिमुकलीचा जीव घेतला अन् मृतदेह खांद्यावर घेऊन पोहचली ठाण्यात..

उद्रेक न्युज वृत्त :-सोलापूर जिल्ह्यातून मन सुन्न करणारी घटना आज सोमवारी सर्वत्र उघडकीस आली. एका २६ वर्षीय जनमदात्या आईने स्वतःच्या दहा महिन्याच्या पोटच्या लेकीला संपवून...

कोणताही पात्र बांधकाम कामगार योजनांपासून वंचित राहू नये.. -प्रत्येक ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर विशेष जनजागृती मोहीम राबवा- आमदार रामदास मसराम

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ,मुंबई अंतर्गत जिल्हा कामगार सुविधा केंद्र,गडचिरोली यांच्या वतीने आज,सोमवार २० जुलै रोजी देसाईगंज पंचायत समिती...

तब्बल ११७ आपले सरकार सेवा केंद्रांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात ११५ ग्रामपंचायत व दोन नगरपरिषद/नगरपंचायत स्तरावरील एकूण ११७ आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी १५ जून २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात...

सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ विद्यार्थी उतरले रत्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-देशातील सध्याचे चित्र काही खरे नाही. अनेकजण आपली जबाबदारी व चूक मान्य करण्यास तयारच नाहीत.तुम्ही काहीही करा,आम्हाला कसलाही फरक पडणार नाही....

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!